शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आदिवासींच्या उपोषणाची सांगता

By admin | Updated: November 15, 2014 22:54 IST

योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली.

ग्रामसचिव निलंबित : योजना राबविण्यात दिरंगाईचा ठपकाराळेगाव : योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली. सन २००२ च्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलाची चौकशी व्हावी, झरगड गटग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई व्हावी, १९९७-९८ मध्ये देण्यात आलेल्या आदिवासी घरकूलप्रकरण सखोल तपासण्यात यावे, ग्रामसभा न घेता मंजूर झालेल्या ठरावाची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांना घेऊन झरगड येथील ग्रामस्थांनी येथे बेमुदत उपोषण सुय केले होते. देवेंद्र आत्राम यांच्या नेतृत्वात नानीबाई कुडमथे, नंदा मेश्राम, सरस्वती मेश्राम, देवकाबाई आत्राम, नामदेव आत्राम, सुरेश पंधरे, सतीश सिडाम, श्रावण पंधरे, गणेश परचाके, चरण पंधरे, सुखदेव आत्राम, वामन सिडाम, समीर मेश्राम, अजाब आत्राम, सिंधू पुसनाके, संभा पंधरे, महादेव पुसनाके, भारत मेश्राम, सित्रू पंधरे आदींनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. शनिवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार डॉ.अशोक उईके, अ‍ॅड.प्रफुल्ल चौहान, गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून चौकशी केली. यात योजना राबविताना दिरंगाई झाल्याचे लक्षात आले. यावरून झरगडचे विद्यमान आणि माजी ग्रामसचिव आर.एम. ठावरी आणि ए.व्ही. कावलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिवाय पुढील योजना राबविताना गरजूंनाच लाभ दिला जाईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण सोडविण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, नागेश्वर हिवरे, बाळासाहेब दिगडे, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल जवादे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)