शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

सेवा सोसायट्या ५९३ गटसचिव केवळ १०८

By admin | Updated: June 17, 2016 02:39 IST

जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या ५९३ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. मात्र त्यावर केवळ १०८ गटसचिव कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे अतिरिक्त प्रभार आहे.

मिशनला सवाल : सांगा, शेतकऱ्यांना वेगाने कर्ज वाटप होणार कसे ?यवतमाळ : जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या ५९३ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. मात्र त्यावर केवळ १०८ गटसचिव कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँका, कमर्शियल बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप होते. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटीमार्फत पीक कर्ज मिळते. जिल्ह्यात काही आदिवासी ग्रामविविध कार्यकारी सोसायट्याही कार्यरत आहेत. जिल्हा बँक या सोसायट्यांना तर सोसायट्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते. आजच्या घडीला जिल्ह्यात ५९३ ग्रामविविध कार्यकारी संस्था कार्यरत आहेत. या शिवाय आदिवासी विविध कार्यकारी संस्थांची संख्या वेगळीच आहे. नियमानुसार तेवढेच गटसचिव असणे गरजेचे असताना प्रत्यक्षात सोसायट्यांच्या तुलनेत १५ टक्केही गटसचिव नाहीत. केवळ १०८ गटसचिव कार्यरत आहेत. त्यामुळे ४८० सोसायट्यांची कर्ज वाटप करताना आणि सोसायटीचे कामकाज चालविताना दाणादाण उडते. एका सचिवाकडे अनेक सोसायट्यांचा प्रभार आहे. तर कुठे सचिवच नाही. पर्यायाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे, पुनर्गठणाचे हिशेब जुळविणे कठीण झाले आहे. त्यामुळेच पीक कर्ज वाटपाला विलंब होतो आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला साडेचारशे कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असले तरी आतापर्यंत केवळ २८० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप होऊ शकले आहे. आणखी ५० ते ६० कोटी रुपये तातडीने वाटप केले जाऊ शकते, असे बँकेतून सांगण्यात आले. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उमरखेड येथील कार्यक्रमात पीक कर्ज वाटपासाठी १५ जूनचा अल्टीमेटम दिला होता. मात्र सेवा सोसायट्यांची संख्या व तेथे उपलब्ध गटसचिव किती याचा आढावा कधी घेतला गेला नाही. गटसचिवच नसेल तर कर्ज मिळणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) \गटसचिव नियुक्तीचे आदेश, पात्रता शिथिल जिल्ह्यातील ५९३ पैकी केवळ १०८ सोसायट्यांमध्येच गटसचिव कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्तांनी सोसायट्यांना गटसचिव नियुक्तीचे अधिकार दिले आहेत. शिवाय त्यांच्या शैक्षणिक पात्रतेत शिथिलताही आणली आहे. मात्र सोसायट्यांना जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी नव्या गटसचिवासाठी घ्यावी लागणार आहे. पूर्वी पदवीधर ही शैक्षणिक पात्रता होती. आता अनुभवी उमेदवारांसाठी दहावी व बारावी ही पात्रता ठेवण्यात आली आहे. मानधन तत्वावर सोसायटी आवश्यकतेनुसार हे गटसचिव नेमणार आहे. त्यात सेवानिवृत्त गटसचिवांचा मार्गही कायम ठेवण्यात आला आहे.