शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

सर्विस रोड बनले चक्क मृत्यूचे सापळे

By admin | Updated: May 21, 2017 00:30 IST

भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.

दारव्हा मार्गावर दररोज अपघात : सर्वाधिक दुचाकी वाहनांचे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. दररोज होणाऱ्या अपघातात कुणाचा हात, कुणाचा पाय तर कुणाचे डोके फुटून रुग्णालयात जात आहेत. सर्वाधिक अपघात दुचाकीचे असून, या मार्गावरील अशास्त्रीय दुभाजक आणि सर्विस रोड अपघातास कारणीभूत ठरत आहेत. यवतमाळ शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणजे दारव्हा मार्ग होय. दारव्हा नाका ते लोहारा चौफुलीपर्यंत या रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावण्यात आले आहे. या मार्गावर गत काही वर्षांपासून दरररोज अपघात घडत आहेत. नेहमी त्याच त्या ठिकाणी अपघात होत आहेत. सर्वाधिक अपघातप्रवण स्थळ म्हणजे उद्योग भवनासमोरील श्रीकृष्णनगरकडे वळणाऱ्या दुभाजकातील ‘गॅप’ होय. यासोबतच एकवीरा चौक, महावीर नगर, दारव्हा नाका, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. भरधाव येणारे दुचाकीचालक एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. गत आठवड्यात एक शिक्षक उद्योग भवनासमोरून श्रीकृष्णनगरकडे वळत होते. त्याचवेळी लोहाराकडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की शिक्षक पाच फुट उसळून त्यांचे डोके दुभाजकाच्या दगडावर आपटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती केले. सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केवळ क्षणभराचा ‘गॅप’ त्यांना आयुष्यभर अपंग करणारा ठरला. महावीर नगरासमोरील दुभाजकातील ‘गॅप’मध्येही (सर्विस रोड) अनेकदा वाहने एकमेकांवर धडकतात. दारव्हा नाक्याकडून येणारे महावीरनगरकडे वळताना लोहाराकडून येणारे वाहन धडकते. अशीच अवस्था एकवीरा चौकातही झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक अपघात सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान होतात. दुचाकीच अपघात नव्हे तर अनेकदा मोठ्या वाहनांचेही अपघात या भागात झालेले आहे. सहज नजर टाकली तरी ठिकठिकाणी वाहनांच्या फुटलेल्या काचांचे तुकडे दिसून येतात. या भरधाव वाहनांना नियंत्रणात आणण्यासाठी असलेले गतिरोधकही कुचकामी ठरले आहेत. गतिरोधकांची लेव्हल रस्त्याच्या बरोबरीनेच आली आहे. त्यामुळ वाहनचालकाला वेग कमी करण्याची गरजच भासत नाही आणि नेमका त्याचवेळी अपघात होतो. अशास्त्रीय दुभाजक यवतमाळ-दारव्हा मार्गावर असलेल्या दुभाजकांत अशास्त्रीय पद्धतीने गॅप ठेवल्या आहे. नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर दुभाजकांमध्ये गॅप आहे. वाहनधारक मागे-पुढे न पाहता आपल्याच तोऱ्यात वाहन वळवितात आणि त्याचेवेळी भरधाव येणारे वाहन त्यावर आदळते. दुभाजकांमध्ये गॅप हे नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर असू नये. थोड अंतर ठेवून गॅप ठेवण्याची मागणी आहे. यवतमाळ शहरातील महादेव मंदिर मार्गावरील दुभाजकाला अगदी शास्त्रीय पद्धतीने गॅप आहे. खासगी रुग्णालयातून येणारी वाहने बरोबर वळण घेऊन तिरंगा चौकातून जातात. तोच गॅप जर अगदी त्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर असता तर तो ही अपघातास कारणभूत ठरला असता. अशाच पद्धतीने दारव्हा मार्गावरील दुभाजकामधील गॅप ठेवण्याची गरज आहे.