शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्विस रोड बनले चक्क मृत्यूचे सापळे

By admin | Updated: May 21, 2017 00:30 IST

भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.

दारव्हा मार्गावर दररोज अपघात : सर्वाधिक दुचाकी वाहनांचे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. दररोज होणाऱ्या अपघातात कुणाचा हात, कुणाचा पाय तर कुणाचे डोके फुटून रुग्णालयात जात आहेत. सर्वाधिक अपघात दुचाकीचे असून, या मार्गावरील अशास्त्रीय दुभाजक आणि सर्विस रोड अपघातास कारणीभूत ठरत आहेत. यवतमाळ शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणजे दारव्हा मार्ग होय. दारव्हा नाका ते लोहारा चौफुलीपर्यंत या रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावण्यात आले आहे. या मार्गावर गत काही वर्षांपासून दरररोज अपघात घडत आहेत. नेहमी त्याच त्या ठिकाणी अपघात होत आहेत. सर्वाधिक अपघातप्रवण स्थळ म्हणजे उद्योग भवनासमोरील श्रीकृष्णनगरकडे वळणाऱ्या दुभाजकातील ‘गॅप’ होय. यासोबतच एकवीरा चौक, महावीर नगर, दारव्हा नाका, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. भरधाव येणारे दुचाकीचालक एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. गत आठवड्यात एक शिक्षक उद्योग भवनासमोरून श्रीकृष्णनगरकडे वळत होते. त्याचवेळी लोहाराकडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की शिक्षक पाच फुट उसळून त्यांचे डोके दुभाजकाच्या दगडावर आपटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती केले. सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केवळ क्षणभराचा ‘गॅप’ त्यांना आयुष्यभर अपंग करणारा ठरला. महावीर नगरासमोरील दुभाजकातील ‘गॅप’मध्येही (सर्विस रोड) अनेकदा वाहने एकमेकांवर धडकतात. दारव्हा नाक्याकडून येणारे महावीरनगरकडे वळताना लोहाराकडून येणारे वाहन धडकते. अशीच अवस्था एकवीरा चौकातही झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक अपघात सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान होतात. दुचाकीच अपघात नव्हे तर अनेकदा मोठ्या वाहनांचेही अपघात या भागात झालेले आहे. सहज नजर टाकली तरी ठिकठिकाणी वाहनांच्या फुटलेल्या काचांचे तुकडे दिसून येतात. या भरधाव वाहनांना नियंत्रणात आणण्यासाठी असलेले गतिरोधकही कुचकामी ठरले आहेत. गतिरोधकांची लेव्हल रस्त्याच्या बरोबरीनेच आली आहे. त्यामुळ वाहनचालकाला वेग कमी करण्याची गरजच भासत नाही आणि नेमका त्याचवेळी अपघात होतो. अशास्त्रीय दुभाजक यवतमाळ-दारव्हा मार्गावर असलेल्या दुभाजकांत अशास्त्रीय पद्धतीने गॅप ठेवल्या आहे. नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर दुभाजकांमध्ये गॅप आहे. वाहनधारक मागे-पुढे न पाहता आपल्याच तोऱ्यात वाहन वळवितात आणि त्याचेवेळी भरधाव येणारे वाहन त्यावर आदळते. दुभाजकांमध्ये गॅप हे नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर असू नये. थोड अंतर ठेवून गॅप ठेवण्याची मागणी आहे. यवतमाळ शहरातील महादेव मंदिर मार्गावरील दुभाजकाला अगदी शास्त्रीय पद्धतीने गॅप आहे. खासगी रुग्णालयातून येणारी वाहने बरोबर वळण घेऊन तिरंगा चौकातून जातात. तोच गॅप जर अगदी त्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर असता तर तो ही अपघातास कारणभूत ठरला असता. अशाच पद्धतीने दारव्हा मार्गावरील दुभाजकामधील गॅप ठेवण्याची गरज आहे.