शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

सर्पदंशाने विद्यार्थी मृत्यूचा ‘सीएम’ने अहवाल मागितला

By admin | Updated: July 19, 2016 02:40 IST

कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे

पांढरकवडा : कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी अहवाल मागितला आहे. आदित्य टेकाम असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंतरगाव येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. तेथे सहाव्या वर्गात शिकणारा आदित्य हा रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शाळेच्या आवारात खेळत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. आदिवासी विद्यार्थ्याच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वच आश्रमशाळांसाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. आश्रमशाळांचे कंपाऊंड तुटले आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवतात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढला असून त्यातूनच आदित्यचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत २१ शासकीय आश्रमशाळा, २८ अनुदानित आश्रमशाळा, १९ आश्रमशाळा व पांढरकवडा प्रकल्प कार्यालय असा भलामोठा आवाका आहे. मात्र तेथील समस्या कायम आहे. तेथील सहायक प्रकल्प अधिकाऱ्याची चार तर आदिवासी विकास अधिकाऱ्याची सात पदे रिक्त आहेत. अनेकदा कार्यालयीन कामकाजासाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नेमले जाते. त्याचा परिणाम आश्रमशाळांच्या कामकाजावर होतो. मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. निवासस्थानांमध्ये सोई-सुविधा नसल्याने तेथे कुटुंबासह राहणे शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. अंतरगाव येथील सर्पदंश मृत्यूप्रकरणाने जिल्हाभरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अंतरगाव प्रमाणेच अन्य आश्रमशाळांमध्येही गवत, झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे तेथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना हे मयत विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन करणार असल्याचे सांगण्यात आले. मृताच्या कुटुंबियांना ७५ हजारांची तातडीची मदत दिली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)मेटीखेडा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर असते तर...४आदित्य टेकाम या विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्याला मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे आदित्यला रुग्णवाहिकेत टाकून यवतमाळला भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी ६ वाजता त्याला जोराचा झटका आला आणि आणखी दोन तासाच्या उपचारानंतर त्याचा ८ वाजता मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. तर काही जण आदित्यचा मृत्यू वाटेतच झाल्याचे सांगत आहे. मेटीखेडा येथे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असते तर कदाचित आदित्यचा जीव वाचला असता असा सूर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.