लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी वेगवेगळी आॅनलाईन लिंक करावी, अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने (व्हीबीव्हीपी) केली आहे.या मागणीसाठी गुरूवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर आहे. शेतीची कामे, मजुरी सोडून त्यांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. इंटरनेटची समस्या येत असल्याने शेतकºयांचे बेहाल सुरू आहे. त्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी, स्वतंत्र लिंक द्यावी, त्यांच्या थम्बमध्ये येणाºया अडचणी दूर कराव्या अशी मागणी करण्यात आली. दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. तो मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून आधार सेंटर बंद होते. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून अनेक जण वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आधार कार्ड सेंटर देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.नायब तहसीलदार गजभिये यांना निवेदन सोपविताना वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास निकम, तालुकाध्यक्ष अनिल बावने, तालुका सचिव रोशन आडे, राकेश कत्तलवार, पंकज आडे, आशुतोष चौधरी, जियाताई चौरीवार, रोशनी डुकरे आदी उपस्थित होते.
कर्जमाफी, शिष्यवृत्तीची लिंक वेगळी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:56 IST
शासन सध्या शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घेत आहे. तर त्याचवेळी विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना गोंधळ उडत आहे.
कर्जमाफी, शिष्यवृत्तीची लिंक वेगळी करा
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची मागणी : व्हीबीव्हीपीचे घाटंजी तहसीलदारांना निवेदन