शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ प्रवास मोफत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:06 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

ठळक मुद्देस्मार्टकार्ड सुविधा । सहा महिने चालणार नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्डद्वारे चार हजार किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती पसरविली जात आहे. महामंडळाची अशी कुठलीही योजना नाही. स्मार्टकार्ड नोंदणी प्रक्रिया पुढील काळाची गरज लक्षात घेवून सुरू करण्यात आली आहे. नोंदणी होईपर्यंत सध्या चालत असलेल्या पद्धतीनुसारच प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड, मतदानकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड आदी सरकारी कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने स्मार्टकार्ड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. विद्यार्थी सवलत पास, समाजसेवक, पुरस्कार प्राप्त नागरिक, पत्रकार आणि ६५ वर्षेवयावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी करू नये, अशी विनंती विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी केली आहे.ज्येष्ठ नागरिकांची नोंदणीकरिता गैरसोय होऊ नये याकरिता यवतमाळ विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले. स्मार्टकार्ड उपलब्ध झाले नसले तरी आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीतच प्रवास करता येणार आहे. स्मार्टकार्ड मिळाल्यानंतर मात्र त्याचाच वापर करता येणार आहे. एसटीद्वारे चार हजार किलोमीटर मोफत प्रवास अशी माहिती पसरविली जात आहे. याकडे ज्येष्ठ नागरिकांनी दुर्लक्ष करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.नोंदणी काऊंटर वाढविण्याची गरजमहाराराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणारे हजारो नागरिक आहेत. त्यांची स्मार्टकार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे. नोंदणीसाठी यवतमाळ बसस्थानकावर केवळ एकच काऊंटर आहे. एका नोंदणीला १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. याच पद्धतीने नोंदणी सुरू राहिल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर व्हावी यासाठी काउंटर वाढविणे आवश्यक आहे. विभागीय कार्यालयात एैसपैस जागा आहे. कर्मचारीही भरपूर आहे. याठिकाणी काऊंटर सुरू केल्यास सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.