शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ प्रवास मोफत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:06 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

ठळक मुद्देस्मार्टकार्ड सुविधा । सहा महिने चालणार नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्डद्वारे चार हजार किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती पसरविली जात आहे. महामंडळाची अशी कुठलीही योजना नाही. स्मार्टकार्ड नोंदणी प्रक्रिया पुढील काळाची गरज लक्षात घेवून सुरू करण्यात आली आहे. नोंदणी होईपर्यंत सध्या चालत असलेल्या पद्धतीनुसारच प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड, मतदानकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड आदी सरकारी कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने स्मार्टकार्ड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. विद्यार्थी सवलत पास, समाजसेवक, पुरस्कार प्राप्त नागरिक, पत्रकार आणि ६५ वर्षेवयावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी करू नये, अशी विनंती विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी केली आहे.ज्येष्ठ नागरिकांची नोंदणीकरिता गैरसोय होऊ नये याकरिता यवतमाळ विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले. स्मार्टकार्ड उपलब्ध झाले नसले तरी आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीतच प्रवास करता येणार आहे. स्मार्टकार्ड मिळाल्यानंतर मात्र त्याचाच वापर करता येणार आहे. एसटीद्वारे चार हजार किलोमीटर मोफत प्रवास अशी माहिती पसरविली जात आहे. याकडे ज्येष्ठ नागरिकांनी दुर्लक्ष करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.नोंदणी काऊंटर वाढविण्याची गरजमहाराराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणारे हजारो नागरिक आहेत. त्यांची स्मार्टकार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे. नोंदणीसाठी यवतमाळ बसस्थानकावर केवळ एकच काऊंटर आहे. एका नोंदणीला १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. याच पद्धतीने नोंदणी सुरू राहिल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर व्हावी यासाठी काउंटर वाढविणे आवश्यक आहे. विभागीय कार्यालयात एैसपैस जागा आहे. कर्मचारीही भरपूर आहे. याठिकाणी काऊंटर सुरू केल्यास सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.