शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

By admin | Updated: February 28, 2015 02:03 IST

उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते.

अविनाश खंदारे  उमरखेड उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत असून ग्राहकांचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमरखेड शहरासह तालुक्यात ढाणकी, मुळावा, पोफाळी, विडूळ, बिटरगाव, ब्राम्हणगाव, चातारी, जेवली, निंगनूर या मोठ्या गावांमध्ये विविध दुकाने आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री केली जाते. कुठलीही वस्तू विकल्यानंतर त्याची पक्की पावती देण्यात यावी, असे आदेश आहे. मात्र लाखो रुपयांचा व्यवहार असला तरी कोऱ्या कागदावरच लिहून दिले जाते. व्यावसायिकांनी वापरलेल्या या फंड्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. कारण एखादी वस्तू सदोष आढळल्यास न्याय मिळवून घेण्यासाठी त्याच्याजवळ कुठलाही पर्याय राहत नाही. बांधकाम साहित्य विक्रेते, कापड दुकानदार, लाकूड व्यावसायिक, औषधी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स सेंटर, कृषी सेवा केंद्र आदी व्यावसायिकांनी ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती देणे बंधनकारक आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र ग्राहकाला छापील पावती दिली जात नाही. ग्राहकही आग्रह धरत नाही. मात्र काही लोकांनी पावतीची मागणी केल्यास एका कोऱ्या कागदावर वस्तूची खरेदी किंमत लिहून दिली जाते. हा प्रकार केवळ कर चुकविण्यासाठी केल्याचे दिसून येते. पक्की पावती दिल्यास त्याचा हिशेब शासनाला सादर करावा लागतो. वर्षभराच्या उलाढालीवर व्यावसायिकाला कराची रक्कम भरावी लागते. ही रक्कम वाचविण्यासाठी पावती दिली जात नाही. मात्र त्याचा फटका ग्राहकाला बसण्याची शक्यता असते. एखादी वस्तू सदोष आढळल्यास त्याबाबत कुठेही न्याय मागता येत नाही. काही ग्राहक आग्रह करून पक्की पावती मागतात. तेव्हा संबंधित विक्रेता टोलवाटोलवी करतो. जास्तच आग्रह झाल्यास कोऱ्या कागदावर आपल्या दुकानाचा शिक्का मारून पावती दिली जाते. यावरून संबंधिताने वस्तू खरेदीबाबत संशय निर्माण होतो. जनजागृतीचा अभाव, ग्राहकच बिल मागत नसल्याचा सुरग्राहक हा राजा आहे, असे म्हटले जाते. मात्र हा राजा वस्तू खरेदी करताना आपले राजतेज दाखवितच नाही. अनेकांना तर पक्की पावती कशाला असे वाटते. विशेष म्हणजे ग्राहकांमध्ये बिलांबाबत जागृतीच नाही. ग्राहक संघटनांच्यावतीनेही जनजागृती केली जात नाही. फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करावी, याचीही माहिती त्यांच्याकडे नसते. अपवाद वगळता कोणताही ग्राहक दुकानदाराला बिल मागतना दिसत नाही. ग्राहकच बिल मागत नाही तर दुकानदार स्वत:हून देणार तरी कसे, असा सवाल काही दुकानदार करीत आहे. मात्र नियमानुसार बिल देणे गरजेचे असताना उमरखेड तालुक्यात बहुतांश दुकानदार कर वाचविण्यासाठी बिलच दिसत नसल्याचे दिसते. परंतु कारवाई कोणावरही झाल्याचे दिसत नाही.