शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या लुटीवर प्रशासनाचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: June 22, 2014 00:12 IST

बाजार समितीमध्ये हमी दरापेक्षा कमी भावात शेतमालाची खरेदी केली जात असल्याच्या बाबीवर जिल्हा उपनिबंधकांनीच शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासाठी

संयुक्त बैठक : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले उपाययोजनांचे निर्देशयवतमाळ : बाजार समितीमध्ये हमी दरापेक्षा कमी भावात शेतमालाची खरेदी केली जात असल्याच्या बाबीवर जिल्हा उपनिबंधकांनीच शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. यामध्ये उपाययोजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राजरोसपणे हरभरा आणि भुईमूग उत्पादकांची बाजारात आर्थिक पिळवणूक केली जात आहे. अशा अडचणीच्या काळात शासनाच्या संस्थाही शेतकऱ्याच्या पाठीशी नसल्याचे दिसून येते. नाबार्डने केवळ दहा हजार क्विंटल तूर, आठ हजार ८०० क्विंटल हरभरा आणि चार हजार क्विंटल भुईमुगाची खरेदी केली. निसर्गाच्या लहरीपणाने पोळलेल्या शेतकऱ्याचे बाजारात व्यापाऱ्यांकडून लचके तोडले जात असताना एकही लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी धावून आला नाही. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे हाल पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक शनिवारी घेतली. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहायक निबंधक, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बाजार समितीचे प्रशासक व सचिव, जिल्हा पणन व्यवस्थापक, तालुका खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक, विदर्भ शेतकरी विकास परिषदेचे विजय कदम, गुणवंत ठोकळ, जयंत गुघाने यांना बोलविण्यात आले.शासनाने भुईमुगाचा हमी दर चार हजार १०० रुपये जाहीर केला आहे. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून दोन हजार २०० ते दोन हजार ६०० रुपये दराने खरेदी सुरू आहे. हरभऱ्याचा दर ३१०० रुपये असताना व्यापारी १८०० ते २२०० रुपये दराने खरेदी करत आहे. याचा मुद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर काय कारवाई करता येईल, अशी विचारणा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी उपस्थितांना केली. बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांनी ४८ तासांपेक्षा अधिक काळ माल ठेवू नये, हे शेड कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालासाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश यावेळी दिले.हरभऱ्याची हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी केली जाते याचे कारण काय हा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. हरभरा पावसात भिजल्याने कमी दर असल्याचे कारण काही अधिकाऱ्यांनी पुढे केले. यावर भुईमुग चांगल्या दर्जाचा असूनही त्याची खरेदी का कमी दरात केली जाते, असा प्रश्न विदर्भ विकास परिषदेच्या सदस्यांनी केला. यावर अधिकाऱ्यांकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आमदारांकडे वेळ नाही. अधिकारीही कर्मचाऱ्यांचीच बाजू घेऊन बोलतात, हे उघड झाले आहे. (शहर वार्ताहर)