शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

समूहाने पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे

By admin | Updated: February 7, 2017 01:26 IST

शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत.

महाबीजचा पुढाकार : कृषी विभागाला नवीन गावात परमिट देण्याचे आदेशयवतमाळ : शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत. याकरिता कृषी विभागाला नवीन गावात भुईमूग बियाण्याचे परमिट देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी ५० ते १०० शेतकऱ्यांना समूहात कृषी विभागाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. त्यादृष्टीने आणखी काही बियाणे महाबीज कंपनी जिल्ह्याकडे वळते करणार आहे.भुईमुगाच्या पेरणीकरिता जिल्ह्याकडे सहा हजार क्विंटल बियाणे वळते झाले. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांचो वाटप झाले तर, बाराशे क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. परमिट उचलणाऱ्या काही शेतकऱ्यानी अद्यापही बियाणे उचलले नाही. त्यांना बुधवारपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणात बियाण्यांची मागणी आहे, त्यानुसार उपलब्ध बियाण्यांचे वाटप झाले असले तरी आवश्यक ते बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांकडून मागणी नोंदविणे आवश्यक आहे. दरम्यान, अनेक गावातून भुईमुगाच्या बियाण्याची मागणी येत आहे. मात्र अशी गावे यादीत नाही. यामुळे अशा गावांचा नव्याने प्रस्ताव स्वीकारला जाणार आहे. याकरिता ५० ते १०० शेतकऱ्यांनी समूहाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्यांच्या योजनेत नाव नोंदविण्याची मागणी करायची आहे. तत्काळ या शेतकऱ्यांना परमिट दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला दोन बियाण्याच्या बॅग अनुदानावर दिल्या जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणित सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार परमिटांचे वितरण करण्यात आले आहे. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांची उचल शेतकऱ्यांनी केली आहे. तर एक हजार क्विंटल बियाण्यांचे परमिट शेतकऱ्यांनंी अद्यापही कृषी सेवा केंद्रांकडे सादर केले नसल्याची माहिती आहे. असे परमिट रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे. (शहर वार्ताहर)महाबीज घेणार दखलमहाबीज कंपनी अनुदानावर बियाणे देत आहे. मात्र तालुका कृषी कार्यालयातून अनेक गावांना परमिट आधीच वाटले असे सांगत परत केले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाबीज कंपनीने अशा प्रकरणात नव्याने बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही नव्याने परमिट न मिळाल्यास महाबीजकडे तक्रार करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप देशमुख यांनी केले आहे.