शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बियाणे बाजारातील उलाढाल ठप्प

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून

केवळ २० टक्के विक्री : लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनाज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून गतवर्षी याच काळात ८० टक्के बियाणे विकले होते. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढण्याची आशा आहे. गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रबी हंगामात गारपिटीत शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. परिणामी नवीन कर्ज मिळण्यात अडचण येत आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्र उलटून तीन दिवस झाले तरी कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख २०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यात कपाशी तीन लाख ८६ हजार हेक्टर, सोयाबीन तीन लाख ८९ हजार हेक्टर, तूर ९० हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी, सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. यवतमाळच्या मेटीखेडा कृषी केंद्राचे संचालक नितीन सरोदे म्हणाले, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून शेतकरी कृषी केंद्रात दिसत आहे. त्यांना बियाण्यांचे भाव कमी होण्याची आशा आहे. सध्या शेतकरी केवळ खत खरेदी करीत आहे. नेर येथील आदर्श कृषी केंद्राचे संचालक शबीर मकवाणी म्हणाले, शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. पाऊस कोसळल्यानंतर गर्दी वाढेल. वणी येथील अभय कृषी केंद्राचे संचालक अभय कटकमवार म्हणाले, यंदा शेतकऱ्यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. बियाण्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे. तसेच कृषी केंद्र चालकांची उधारीवर माल देण्याची तयारी नाही. त्यामुळे बाजारात गर्दी कमी आहे. यवतमाळ येथील अजय कृषी केंद्राचे संचालक अजय येरावार म्हणाले, प्रत्येक शेतकरी दुकानदाराला बियाण्यांची गॅरंटी मागत आहे. बियाणे सर्टिफाईड असल्याचे प्रमाणपत्र असल्याने आम्ही गॅरंटी घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.