शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भरपाईशिवाय बियाणे कंपन्यांना सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:56 IST

यंदा कापसाचे पीक चांगले होते. पण पुन्हा एकदा शेतकºयांचे नशिब आडवे आले. बोंडअळीने पूर्ण उत्पादनाचे नुकसान झाले. बियाणे कंपन्यांना परवानगी देतानाच त्यांच्याकडून भरपाईची तरतूद करण्यात आलेली असते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : घारफळ येथे बळीराजा जलसंजीवनीचे उद्घाटन

आरिफ अली।लोकमत न्यूज नेटवर्कघारफळ (बाभूळगाव) : यंदा कापसाचे पीक चांगले होते. पण पुन्हा एकदा शेतकºयांचे नशिब आडवे आले. बोंडअळीने पूर्ण उत्पादनाचे नुकसान झाले. बियाणे कंपन्यांना परवानगी देतानाच त्यांच्याकडून भरपाईची तरतूद करण्यात आलेली असते. त्यामुळे बोगस बियाणे विकणाºया कंपन्यांना सरकार सोडणार नाही. त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करूनच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जाहीर कार्यक्रमात दिली.बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वितीकरण समारंभारत ते बोलत होते. या योजनेअंतर्गत ९ तालुक्यातील १५ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७३८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी रिमोट कंट्रोल द्वारे या योजनेचे उद्घाटन केले. निधी खर्च होणाºया १५ प्रकल्पांची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय जलसंसाधन, भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.मुख्यमंत्री म्हणाले, कर्जमाफी योजना अत्यंत काटेकोर पूर्ण केली जात आहे. आतापर्यंत राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांचे अकाउंट क्लियर केले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात १ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात कर्जमाफीचे ५०० कोटी रुपये बँकांपर्यंत पोहोचलेले आहेत. पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गडकरी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या असूनही शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणावे लागते. या स्थितीची गडकरींनी दखल घेतली. आता १४ अर्धवट प्रकल्पांचे काम मार्चपर्यंत तर एका प्रकल्पाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे अहीर म्हणाले. पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, ९ लाख हेक्टर लागवडीखाली असलेल्या जिल्ह्यात प्रत्यक्ष सिंचन केवळ ११ टक्के आहे. आता अर्थसंकल्पातून सरकार शेतीत मोठी गुंतवणूक करीत आहे. बेंबळाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून मागील सरकारने अन्याय केला होता. आता आम्ही ११५ किलोमीटरचे मायनर, पाटसºयासह सर्व कामे दोन वर्षात पूर्ण करू. २० हजार वीज कनेक्शन कृषी पंपांना दिले आहे. मार्चपासून डिमांड नोट भरताच ४८ तासाच्या आत कृषी पंपाला वीज मिळेल, असे त्यांनी जाहीर केले. 

दोन वर्षात जिल्ह्यात ४३ हजार घरे देणारपंतप्रधानांनी २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची घोषणा केली आहे. मात्र राज्यात आम्ही २०१९ पर्यंतच हे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यात साधारण साडेबारा लाख लोक बेघर आहेत. जानेवारीपर्यंत त्यांची नोंदणी करून फेब्रुवारी, मार्चमध्ये त्यांना घर बांधणीचा पहिला हप्ता देणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यात ४३ हजार घरे देण्याचे लक्ष्य आहे. जेथे प्लॉट उपलब्ध नाही, तेथे ५० हजार रुपयांचा निधी जागा खरेदीसाठीही दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस