शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ जोडण्यांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 17, 2014 23:01 IST

शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न

यवतमाळ : शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता बोलती बंद झाली आहे. अवैधरीत्या नळ जोडण्या घेतलेल्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची धमकीही या विभागाने दिली आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामीण पंचायत क्षेत्राला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोठमोठ्या पाईप लाईन टाकण्यात आल्या आहे. त्यावर छोट्या पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही लोकांनी मुख्य पाईप लाईन फोडून नळ जोडण्या घेतल्या आहे. या प्रकारात प्रामाणिकपणे पाणी घेणाऱ्यांवर अन्याय होत आहे. वाजवी पेक्षा आणि वापरा पेक्षा अधिक पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. हा सर्व प्रकार पाणी चोरीच्या प्रकारातून होत आहे. ज्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या, तेथे तर हमखास पाण्याची चोरी होत आहे. काही लोकांनी जुन्याच पाईपलाईनवरून जोडण्या सुरू ठेवल्या आहे. यामुळे टाकीतून सोडले जाणारे पाणी आणि बिलाचा ताळमेळ बसत नव्हता. तरीही प्राधिकरण शहरात पाण्याची चोरी होत नाही, असे ठामपणे सांगत होते. मात्र आता प्राधिकरणानेच विनापरवानगी नळ जोडणी घेतल्याच्या बाबीवर मोहोर लावली आहे. एवढेच नाही तर रितसर अर्ज, मंजुरी आणि आवश्यक शुल्काचा भरणा करून जोडण्या वैध करण्याची संधीही देण्यात आली आहे. यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जोडण्या वैध न झाल्यास पूर्व सूचना न देता नळ जोडण्या बंद आणि फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक या बाबी प्राधिकरणाने यापूर्वीच करायला पाहिजे होत्या. उशिरा जाग आली असली तरी प्रत्यक्ष काय कारवाई होते याकडे लक्ष लागेल आहे. (वार्ताहर)