शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अवैध नळ जोडण्यांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 17, 2014 23:01 IST

शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न

यवतमाळ : शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता बोलती बंद झाली आहे. अवैधरीत्या नळ जोडण्या घेतलेल्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची धमकीही या विभागाने दिली आहे. यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामीण पंचायत क्षेत्राला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोठमोठ्या पाईप लाईन टाकण्यात आल्या आहे. त्यावर छोट्या पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही लोकांनी मुख्य पाईप लाईन फोडून नळ जोडण्या घेतल्या आहे. या प्रकारात प्रामाणिकपणे पाणी घेणाऱ्यांवर अन्याय होत आहे. वाजवी पेक्षा आणि वापरा पेक्षा अधिक पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. हा सर्व प्रकार पाणी चोरीच्या प्रकारातून होत आहे. ज्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या, तेथे तर हमखास पाण्याची चोरी होत आहे. काही लोकांनी जुन्याच पाईपलाईनवरून जोडण्या सुरू ठेवल्या आहे. यामुळे टाकीतून सोडले जाणारे पाणी आणि बिलाचा ताळमेळ बसत नव्हता. तरीही प्राधिकरण शहरात पाण्याची चोरी होत नाही, असे ठामपणे सांगत होते. मात्र आता प्राधिकरणानेच विनापरवानगी नळ जोडणी घेतल्याच्या बाबीवर मोहोर लावली आहे. एवढेच नाही तर रितसर अर्ज, मंजुरी आणि आवश्यक शुल्काचा भरणा करून जोडण्या वैध करण्याची संधीही देण्यात आली आहे. यासाठी १ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जोडण्या वैध न झाल्यास पूर्व सूचना न देता नळ जोडण्या बंद आणि फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. वास्तविक या बाबी प्राधिकरणाने यापूर्वीच करायला पाहिजे होत्या. उशिरा जाग आली असली तरी प्रत्यक्ष काय कारवाई होते याकडे लक्ष लागेल आहे. (वार्ताहर)