शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वादावर पडदा

By admin | Updated: February 22, 2015 02:02 IST

बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणात न्यायालाच्या निकालामुळे वाद मिटला आहे.

यवतमाळ : बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणात न्यायालाच्या निकालामुळे वाद मिटला आहे. मिराताई आंबेडकर यांचा अध्यक्षपदावरील दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यात विश्वस्तांचा विजय झाला आहे, अशी माहिती शनिवारी येथे पत्र परिषदेत चंद्रबोधी पाटील यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भय्यासाहेब आंबेडकर यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर मिराताई आंबेडकर यांनी स्वत:ला अध्यक्ष घोषित केले. याबाबत सोसायटीतील सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. आयुक्तांनी मिराताई आंबेडकर यांची नियुक्ती रद्द ठरविली. यानंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा या खटल्याचा प्रवास चालला, अशी माहिती चंद्रबोधी पाटील यांनी पत्र परिषदेतून दिली. या पात्ररिषदेला भूपेश थुलकर, भीमराव कांबळे, अनिल कुमार मेश्राम, मनोहर दुपारे, सुखदेवराव जाधव, जयकृष्ण बोरकर, धर्मपाल माने, गोविंद मेश्राम, चंद्रकांत अलोणे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)