शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

जादा पटाच्या शाळांचा अभ्यास अन् कमी पटावर डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 14:50 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगदी मोजक्या शाळांमधील पटसंख्या वाढत आहे. अशा शाळांचा अभ्यास करून शिक्षण विभाग आपला ‘प्रगती अहवाल’ तयार करवून घेणार आहे. तर त्याचवेळी राज्यातील हजारो शाळांमधील पटसंख्या घटत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा उफराटा कारभार‘टाटा’च्या हातून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगदी मोजक्या शाळांमधील पटसंख्या वाढत आहे. अशा शाळांचा अभ्यास करून शिक्षण विभाग आपला ‘प्रगती अहवाल’ तयार करवून घेणार आहे. तर त्याचवेळी राज्यातील हजारो शाळांमधील पटसंख्या घटत आहे. पटसंख्येविना शाळा बंद करण्याची वेळ शासनावर ओढवलेली आहे. मात्र अशा शाळांमधील पटसंख्या घटीचा अभ्यास करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडक शाळांचीच पटसंख्या वाढत आहे. तेथे खासगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होत आहेत. अशा शाळांमधील चांगल्या उपक्रमांचा अभ्यास करण्याची कामगिरी विद्या प्राधिकरणाने टाटा ट्रस्टला सोपविली आहे. टाटा ट्रस्ट या शाळांमधील पटवाढीच्या कारणांचा अहवाल तयार करून तो शासनाला सादर करणार आहे.एकीकडे पट वाढणाऱ्या शाळांचा अभ्यास करताना जेथील पटसंख्या कमालीच्या वेगाने घटत आहे, अशा शाळांकडे डोळेझाक केली जात आहे. प्रत्यक्षात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४२ हजार ९८५ शाळांमधील पटसंख्या ही आरटीई कायद्यातील निकषापेक्षा कमी आहे. खुद्द शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनीच १ जुलै रोजी विधिमंडळात जाहीर केलेला ही आकडेवारी आहे. मात्र अशा ठिकाणच्या पट घटण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शासनाने कोणत्याही संस्थेला जबाबदारी दिली नाही. स्वत: शासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही कधी याबाबतचा अहवाल मागविण्यात आला नाही. आता केवळ काही शाळांमधील पटवाढीचा अहवाल मिळवून शिक्षण विभाग स्वत:ची पाठ थोपटून घेणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटत आहे.

ही चमू करणार अभ्यासजादा पटाच्या शाळांचा अभ्यास करण्यासाठी टाटा ट्रस्टने हे गट तयार केला आहे. त्यात टाटा समाज विज्ञान संस्थेचे हैदराबाद व मुंबईतील तज्ज्ञ, मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे तज्ज्ञ, बंगळूरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठातील तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. या तज्ज्ञांसोबत टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी राज्यातील निवडक जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिकेच्या शाळांना भेटी देतील. तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मुलाखती घेऊन शाळेच्या यशाचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.‘ती’ सत्यशोधन समिती कधी होणार?२०१७ मध्ये १० पेक्षा कमी पटाच्या १२९२ शाळा समायोजित करण्याचे (बंद करण्याचे) आदेश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त आणि संचालकांना १६ नोव्हेंबर रोजी दिले होते. प्रत्यक्षात स्थळतपासणी केल्यानंतर यातील ३९१ शाळांचेच समायोजन करण्यात आले. मात्र उर्वरित शाळांमधील घटलेली पटसंख्या, तसेच २०१८-१९ मधील (४,७४९ शाळांमधील) घटलेल्या पटसंख्येची कारणे शोधण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने केला नाही. नुकतीच विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रा. अनिल सोले यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली. तेव्हा पटसंख्या घटण्याची कारणे शोधण्यासाठी अद्यापही शासनाने सत्यशोधन समिती गठितच केली नसल्याचे शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी कबूल केले. आता ही समिती गठित करू, असे आश्वासन देतानाही त्यांनी ही समिती प्रत्यक्षात कधी काम सुरू करणार, याचे सूतोवाच केलेले नाही. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा