शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा

By admin | Updated: April 30, 2017 01:16 IST

समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे.

मोफत शिक्षण : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी धडपडयवतमाळ : समाजातील गोरगरिब, वंचितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती महिला संस्था गेल्या आठ वर्षांपासून धडपडत आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून आपल्या निवासी शाळेत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल, अशी माहिती संस्थेच्या संचालिका कांचन वीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रातर्फे २००९ पासून दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे आश्रमशाळा चालविली जाते. सामाजिक कार्यकर्त्या कांचन वीर यांनी पदरमोड करून ही शाळा चालविली आहे. शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. मात्र शिक्षणाशिवायही शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनेक मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्याकरिता निवासी स्वरूपाची शाळा आवश्यक आहे. त्यामुळेच आता आपल्या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण व निवासाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे कांचन वीर यांनी सांगितले. नेर येथील तंबाखे नगरात ही शाळा सुरू होत आहे. शाळेच्या जागेसाठी कांचन वीर यांना स्वत:ची पाच एकर शेती विकावी लागली. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता ही समाजसेवा आपण करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील गरजू आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांची यादी तहसील प्रशासनाकडून आपण घेणार असून, त्यांना शाळेत प्रवेश देणार असल्याचेही त्या म्हणाल्या. या उपक्रमासाठी दानशुरांनी मदत देण्याचे आवाहनही त्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)