शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अनलाॅकमध्येही शाळा राहणार ‘लाॅक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देगुरुजींना मात्र यावेच लागेल : विद्यार्थी-पालक संभ्रमात, शासन आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्या कोरोनाने गेल्या वर्षी शाळा कुलूपबंद केल्या होत्या, तो कोरोना आता थंडावला आहे. त्यामुळे नव्या सत्रासाठी शाळा उघडणार का, हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने कोरोना घटल्याचे कारण पुढे करीत संपूर्ण बाजारपेठ खुली केली, तरी शाळा उघडण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे अनलाॅकच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील सव्वातीन हजार शाळा बंदच राहणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, नवीन सत्रात शाळा २८ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र केवळ शिक्षकांनाच शाळेत बोलावले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार नाही. शिक्षक शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम करणार आहेत. यावरून शाळांमधील वर्गखोल्या बंद अन् स्टाफरूम मात्र सुरू असे चित्र नव्या सत्रात पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या ३३५३ शाळा आहे. त्यापैकी २१०९ जिल्हा परिषद, १४८ शासकीय, ७०२ अनुदानित तर ३९४ विनाअनुदानित आहेत. प्रत्यक्षात विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. तेथेही केवळ शिक्षकांना शाळेत बोलावण्यात आले आहे. यवतमाळसह विदर्भात दरवर्षीप्रमाणे २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. मात्र २६ व २७ रोजी शासकीय सुटी असल्याने २८ जूनपासून सत्र सुरू होत आहे. कोरोना कमी झालेला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे तूर्त विद्यार्थ्यांना शाळेत न बोलाविता केवळ शिक्षकांना बोलाविले जाणार आहे. 

शिक्षणाधिकारी म्हणतात, प्लॅनिंग सुरू आहेमहाराष्ट्रात ज्याप्रमाणे शाळा सुरू झाल्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही होतील. शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. मात्र सध्या विद्यार्थ्यांना न बोलाविता त्यांना ऑनलाइन शिकविले जाईल. एससीआरटीमार्फत सेतू वर्ग सुरू होतील. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहून ग्रामीण भागासाठी आणखी प्लॅनिंग करता येईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ

शाळा सुरू करायची म्हटली तर..

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहेत. त्या आता सुरू करायच्या म्हटल्या तर वर्गखोल्यांच्या साफसफाईसह अनेक कामे करावी लागतील. याबाबत शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, शाळांच्या मागणीप्रमाणे मान्सनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी १० लाखांचा निधी ठेवलेला आहे. ज्या शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या, त्यांची ग्रामपंचायतीमार्फत सफाई, निर्जंतुकीकरण केले जाईल. शाळा स्तरावर पटसंख्येनुसार १० टक्के निधी असतो, त्यातूनही शाळेच्या स्वच्छतेची कामे करता येतील.

सर्वच गुरुजींची शाळा सुरू होणार...?- जिल्ह्यात सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाकडून शाळांना नवीन शैक्षणिक वर्षाबाबत तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत तर ऑनलाइन अभ्यासक्रम उपक्रम राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या