शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वाटखेड शाळेचा कारभार केवळ दोन शिक्षकांवर

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

हिवरी : परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. वाटखेड शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तुकड्या आहे. एकूण शाळेची पटसंख्या ही ४८ इतकी आहे. या तुकड्यांसाठी चार शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र येथील जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या या गावाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दोन शिक्षक, पाच तुकड्या शिकविण्यासाठी चांगलीच कसरत करतात. एकाच खोलीत दोन वर्ग आणि एक वर्ग वऱ्हांड्यात बसून मधोमध शिक्षकाचे अध्यापन कार्य चालते. पटसंख्या कमी असली तरी वेगवेगळ्या तुकड्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवणे शक्य होत नाही. सुरू असलेला पाठ हा पाचवीचा आहे की दुसरीचा असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा पाया समजल्या जातो. या वयात आत्मसात केलेले ज्ञान आणि रुजलेल्या संकल्पना जीवनभर उपयोगी पडतात. त्यामुळेच राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. वाटखेड येथे मात्र दुर्दैवाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. या बाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली. त्यानंतरही येथे शिक्षक देण्यात आला नाही. अजून किती दिवस दोन शिक्षकांच्या भरोशावर या शाळेचा गाडा चालणार असा प्रश्न आहे. शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये ११ विद्यार्थी, इयत्ता दुसरी ९, इयत्ता तिसरी १२, इयत्ता चौथी ९, इयत्ता पाचवी ७ विद्यार्थी आहे.आता जिल्हापरिषद प्रशासनाने तातडीने शिक्षक दिला नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षकाविना विद्यार्थ्यांचे अद्यापनच खोळंबले आहे. (वार्ताहर)