शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

वाटखेड शाळेचा कारभार केवळ दोन शिक्षकांवर

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

हिवरी : परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. वाटखेड शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तुकड्या आहे. एकूण शाळेची पटसंख्या ही ४८ इतकी आहे. या तुकड्यांसाठी चार शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र येथील जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या या गावाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दोन शिक्षक, पाच तुकड्या शिकविण्यासाठी चांगलीच कसरत करतात. एकाच खोलीत दोन वर्ग आणि एक वर्ग वऱ्हांड्यात बसून मधोमध शिक्षकाचे अध्यापन कार्य चालते. पटसंख्या कमी असली तरी वेगवेगळ्या तुकड्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवणे शक्य होत नाही. सुरू असलेला पाठ हा पाचवीचा आहे की दुसरीचा असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा पाया समजल्या जातो. या वयात आत्मसात केलेले ज्ञान आणि रुजलेल्या संकल्पना जीवनभर उपयोगी पडतात. त्यामुळेच राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. वाटखेड येथे मात्र दुर्दैवाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. या बाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली. त्यानंतरही येथे शिक्षक देण्यात आला नाही. अजून किती दिवस दोन शिक्षकांच्या भरोशावर या शाळेचा गाडा चालणार असा प्रश्न आहे. शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये ११ विद्यार्थी, इयत्ता दुसरी ९, इयत्ता तिसरी १२, इयत्ता चौथी ९, इयत्ता पाचवी ७ विद्यार्थी आहे.आता जिल्हापरिषद प्रशासनाने तातडीने शिक्षक दिला नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षकाविना विद्यार्थ्यांचे अद्यापनच खोळंबले आहे. (वार्ताहर)