शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

By अविनाश साबापुरे | Updated: December 19, 2023 17:07 IST

शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते.

यवतमाळ : आजारांवर सर्वांत मोठे औषध असते आपल्या माणसांकडून होणारी विचारपूस. खेड्यापाड्यात तर आजारी पडणाऱ्या मुलांना खरे औषधही मिळणे दुरापास्त, मग असे आपुलकीचे औषध कुठून मिळणार? पण कळंब तालुक्यातील सुकळी गावात मात्र आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंगळवारी थेट शाळेची आगगाडी धडकली. अख्या शाळेने आजारी दोस्तांची विचारपूस केली अन् बिस्कीटचा पुडा देत ‘गेट वेल सून’ म्हणून शुभेच्छांचे औषधही दिले.

सुकळी जिल्हा परिषद शाळेने शाळेची दैनंदिन उपस्थिती शंभर टक्के ठेवण्यासाठी ‘आगगाडी’चा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सकाळी काही विद्यार्थी शाळेत पोहोचले की, ते एकमेकांचा हात धरून ‘आगगाडी’ तयार करतात. मग ही आगगाडी गावभर फिरून एकेका विद्यार्थ्याच्या घरी पोहोचते. प्रत्येक घरातील विद्यार्थ्याला ‘नवा डबा’ म्हणून आगगाडीला जोडून घेतले जाते व गाडी पुढच्या दोस्ताच्या घरी जाते. शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते. पण याच उपक्रमाचा आणखी एक उपयोग सध्या सुरू झाला आहे.

सध्या थंडी वाढल्याने अनेक मुले आजारी पडत आहेत. मंगळवारी ही आगगाडी शाळेत आली, तेव्हा शिक्षकांना दोन विद्यार्थी गैरहजर आढळले. दुसऱ्या वर्गातला धनंजय सतीश जाधव आणि चौथीतली इशिका गणेश धोटे हे दोघे आजारी असल्याचे कळले. मग ही अख्खी ‘आगगाडी’ शिक्षकांना सोबत घेऊन त्या आजारी विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली. सारे दोस्त आणि शिक्षक यांनी आजारी विद्यार्थ्यांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्यांच्या आईबाबांसोबतही संवाद साधला. आजारी धनंजय व इशिकाला बिस्कीट पुडा देऊन सर्व मुले म्हणाली, ‘गेट वेल सून’! या छोट्याशा भेटीने आजारी मुलांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

येथील मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि तंत्रस्नेही शिक्षक संदीप कोल्हे यांनी असे वेगवेगळे उपक्रम येथे सुरू केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अडचणींना काहीच कमतरता नसते. पण काम करणाऱ्यांना अडचणींवर कल्पकतेतून मात करता येते. याचेच ही शाळा उदाहरण ठरली आहे.

शाळेत मुलांच्या अनुपस्थितीची अनेक कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे मुलांचे आजारपण. आजारपणात मुलांना शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी भेटल्या, त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तर आजारातून लवकर बरे होण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. शाळेतील आनंदी व खेळकर वातावरण मुलांना खुणावते. म्हणून आमच्या आगगाडीचा खूप उपयोग आहे.- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ