शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आजारी मुलांच्या घरी जेव्हा शाळेची ‘आगगाडी’ पोहोचते...!

By अविनाश साबापुरे | Updated: December 19, 2023 17:07 IST

शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते.

यवतमाळ : आजारांवर सर्वांत मोठे औषध असते आपल्या माणसांकडून होणारी विचारपूस. खेड्यापाड्यात तर आजारी पडणाऱ्या मुलांना खरे औषधही मिळणे दुरापास्त, मग असे आपुलकीचे औषध कुठून मिळणार? पण कळंब तालुक्यातील सुकळी गावात मात्र आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंगळवारी थेट शाळेची आगगाडी धडकली. अख्या शाळेने आजारी दोस्तांची विचारपूस केली अन् बिस्कीटचा पुडा देत ‘गेट वेल सून’ म्हणून शुभेच्छांचे औषधही दिले.

सुकळी जिल्हा परिषद शाळेने शाळेची दैनंदिन उपस्थिती शंभर टक्के ठेवण्यासाठी ‘आगगाडी’चा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सकाळी काही विद्यार्थी शाळेत पोहोचले की, ते एकमेकांचा हात धरून ‘आगगाडी’ तयार करतात. मग ही आगगाडी गावभर फिरून एकेका विद्यार्थ्याच्या घरी पोहोचते. प्रत्येक घरातील विद्यार्थ्याला ‘नवा डबा’ म्हणून आगगाडीला जोडून घेतले जाते व गाडी पुढच्या दोस्ताच्या घरी जाते. शाळेची जेवढी पटसंख्या आहे, तेवढे सर्वच्या सर्व डबे घेऊन ही ‘आगगाडी’ वेळेत शाळेत पोहोचते. पण याच उपक्रमाचा आणखी एक उपयोग सध्या सुरू झाला आहे.

सध्या थंडी वाढल्याने अनेक मुले आजारी पडत आहेत. मंगळवारी ही आगगाडी शाळेत आली, तेव्हा शिक्षकांना दोन विद्यार्थी गैरहजर आढळले. दुसऱ्या वर्गातला धनंजय सतीश जाधव आणि चौथीतली इशिका गणेश धोटे हे दोघे आजारी असल्याचे कळले. मग ही अख्खी ‘आगगाडी’ शिक्षकांना सोबत घेऊन त्या आजारी विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली. सारे दोस्त आणि शिक्षक यांनी आजारी विद्यार्थ्यांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्यांच्या आईबाबांसोबतही संवाद साधला. आजारी धनंजय व इशिकाला बिस्कीट पुडा देऊन सर्व मुले म्हणाली, ‘गेट वेल सून’! या छोट्याशा भेटीने आजारी मुलांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

येथील मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि तंत्रस्नेही शिक्षक संदीप कोल्हे यांनी असे वेगवेगळे उपक्रम येथे सुरू केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अडचणींना काहीच कमतरता नसते. पण काम करणाऱ्यांना अडचणींवर कल्पकतेतून मात करता येते. याचेच ही शाळा उदाहरण ठरली आहे.

शाळेत मुलांच्या अनुपस्थितीची अनेक कारणे असतात. त्यापैकी एक म्हणजे मुलांचे आजारपण. आजारपणात मुलांना शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी भेटल्या, त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तर आजारातून लवकर बरे होण्याची सकारात्मक ऊर्जा मिळते. शाळेतील आनंदी व खेळकर वातावरण मुलांना खुणावते. म्हणून आमच्या आगगाडीचा खूप उपयोग आहे.- संदीप कोल्हे, शिक्षक, सुकळी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ