शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समिती कागदोपत्री

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रगती बघितल्यास

स्वप्नील कनवाळे - पोफाळीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रगती बघितल्यास हा पैसा व्यर्थ तर जात नाही ना, अशी शंका येते. शाळांतील शिक्षणाचा दर्जा उंचवावा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बहुतांश गावातील या समित्या केवळ कागदोपत्री दिसत आहे. तर शिक्षकांना मुख्यालयाचे वावडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मोठी फी भरून विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवित आहे. उलट गावात मिळणाऱ्या नि:शुल्क शिक्षणासाठी पालक उदासीन आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश आणि मध्यान्ह भोजनही दिले जाते. परंतु पालक याकडे पाठ फिरवितात. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा होय. हा दर्जा का ढासळत गेला, याचे कुणीही चिंतन करताना दिसत नाही. पूर्वी शिक्षक खेड्यातच राहून ज्ञानार्जनाचे कार्य करीत होते. शिक्षकाच्या डोळ्यासमोर २४ तास विद्यार्थी असायचे. परंतु अलिकडे गुरुजींनी गाव सोडले. शहराकडे धाव घेतली. शहरातून घड्याळ्याच्या काट्याला बांधून यायचे आणि पाच वाजले की पुन्हा गावाकडे निघायचे, अशी स्थिती आहे. या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. गावातील प्रमुख व्यक्तींची या समितीत निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात आज या समित्या केवळ कागदावर दिसत आहे. शिक्षक बाहेरगावावरून जाणे-येणे करीत असले तरी कुणीही त्यांना हटकताना दिसत नाही. परिणामी शाळातील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास उमरखेड तालुक्यातील कळमुला येथील जिल्हा परिषद शाळेचे देता येईल. येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून ९५ पटसंख्या आहे. एवढी कमी पटसंख्या का याचा कुणी आजपर्यंत विचार केला नाही. दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. या उलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ग्रामीण पालकांची प्रवेशासाठी धडपड सुरू असते.