शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीकडून टंचाई कॅश

By admin | Updated: April 23, 2016 02:32 IST

रेती, वाळू माफियाच्या धर्तीवर यवतमाळात पाणी माफियाही तयार झाले आहे. या पाणी माफियांची टँकर लॉबी यवतमाळकर नागरिकांची सर्रास लूट करीत आहे.

वर्षभरात दुप्पट दर : पाण्याचा मोफत उपसा, विक्री मात्र बेभाव यवतमाळ : रेती, वाळू माफियाच्या धर्तीवर यवतमाळात पाणी माफियाही तयार झाले आहे. या पाणी माफियांची टँकर लॉबी यवतमाळकर नागरिकांची सर्रास लूट करीत आहे. गेल्या वर्षी ३०० रुपये असलेला पाण्याचा दर यावर्षी थेट दुप्पट ६०० रुपये करण्यात आला आहे. सार्वजनिक विहिरींवरून पाण्याचा मोफत उपसा करून त्याची बेभाव विक्री केली जात आहे. यवतमाळकर नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे वेळापत्रकही तयार केले आहे. यवतमाळच्या हद्दवाढीतील जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रात तर पाणीपुरवठ्याची समस्या आणखीच गंभीर आहे. गुंडभर पाण्यासाठी हापशीवर तासन्तास उभे रहावे लागते. या पाण्यापोटी अनेकांचा दिवसभराचा रोजगारही बुडतो. आई-वडील मोलमजुरीला गेल्याने शाळा बुडवून विद्यार्थी पाण्यासाठी रांगेत उभा असल्याचे चित्र आहे. या भीषण पाणीटंचाईने सामान्य नागरिक होरपळला जात असताना शहरात नव्यानेच उदयास आलेली टँकर लॉबी मात्र जाम खूश आहे. पाणीटंचाई आणखी तीव्र व्हावी आणि आपल्याला पैसे कमविता यावे, असाच या लॉबीचा मनसुबा आहे. त्यामुळेच टंचाईच्या बातम्या येताच ही लॉबी आनंदी होते. या बातम्या आणखी तीव्र स्वरूपात मांडाव्या म्हणून माध्यमांकडे साकडे घालताना दिसत आहे. यवतमाळात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. मात्र दुसरीकडे सार्वजनिक विहिरींमधून उपसा करून हे पाणी खासगी बांधकामांसाठी पुरविले जात आहे. पाणीटंचाईने टँकर लॉबीत स्पर्धा निर्माण केली आहे. ३०० रुपयाचा टँकर आता ६०० रुपयात दिला जात आहे. नेहरु उद्यान, शिवाजी उद्यान व अन्य विहिरींमधून मोफत पाणी भरुन टँकरद्वारे त्याची विक्री केली जात आहे. भोसा, उमरसरा, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा या लगतच्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातसुद्धा पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आहे. (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ नगरपरिषदेचा सावळा गोंधळ, कमांड असलेल्या नगरसेवकांनाच टँकरशहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना यवतमाळ नगर परिषदेचा सावळा गोंधळ सुरू आहे. तेथील पाणीपुरवठा विभाग प्रमुख सुटीवर आहे. लिपिकाच्या भरोश्यावर डोल्हारा उभा आहे. प्रशासन ही टंचाई तेवढ्या गांभीर्याने घेताना दिसत नाही. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा न झाल्याने कृती आराखड्याला मंजुरी नाही. पर्यायाने निधी खर्चालाही मंजुरी नाही. स्थायी समितीने सहा टँकर मंजूर केले होते. सध्या १८ टँकर सुरू असून त्याची कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार आहे. शहरातील दहा पैकी आठ प्रभागात टँकरने पाणी पुरवठा होतो आहे. त्यातही नगरसेवकाचे राजकीय वजन पाहून त्याच्या नशिबी पाण्याचा टँकर मिळतो. नगर परिषदेची पाणीटंचाईवर विशेष सभाही झाली नाही. यावरुन नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी शहरवासीयांच्या पाण्याच्या समस्येवर किती गंभीर आहे, हे उघड होते. पाणीपुरवठ्याआड सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारणटँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याआड यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दवाढीनंतर आगामी चार महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे राजकारण खेळले जात आहे. नगर परिषदेच्या जुन्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना वंचित ठेऊन हद्दवाढ झालेल्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टँकर नेले जात आहे. या माध्यमातून तेथील मतदारांना कॅश करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. काही सामाजिक संघटनांचा छुपा अजेंडाही या पाणीपुरवठ्यातून लपलेला नाही. ३० फुटांवर लागले पाणीलोहारा-वाघापूरच्या सीमेवरील एका नागरिकाला अवघ्या ३० फुटावर बोअरला पाणी लागले. त्यानेही शक्कल लढविली. ३० फुटावर पाणी लागले असताना त्याने दीडशे ते दोनशे फूट बोअर खोदले. आता या बोअरमधून तो टँकरला ७० ते १०० रुपये दराने पाणी पुरवठा करतो आहे.