शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

उमरखेडच्या ५० गावांत टंचाई

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

पाणीटंचाई : पैनगंगा नदी पडली कोरडी, नागरिकांची भटकंती

उमरखेड : यावर्षी पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडल्याने या नदीकाठावरील ५० ते ६० गावांमधील नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ही समस्या या परिसरात भेडसावत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर्षी पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतरही पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडली. या नदीच्या काठावर ५० ते ६० गावे आहेत. या गावांसाठी पैनगंगा ही जीवनदायिनी आहे. या परिसरातील शेतीसुद्धा नदी पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी लवकरच नदी कोरडी पडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता एप्रिल, मे महिन्याला वेळ असतानाही फेब्रुवारीपासूनच या गावांमध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात ती अधिकच तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती अधिकच विदारक होणार आहे. ५० ते ६० गावांतील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आतापासूनच एप्रिल, मे महिन्याचे नियोजन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. संबंधित यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)