शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

उमरखेडच्या ५० गावांत टंचाई

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

पाणीटंचाई : पैनगंगा नदी पडली कोरडी, नागरिकांची भटकंती

उमरखेड : यावर्षी पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडल्याने या नदीकाठावरील ५० ते ६० गावांमधील नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ही समस्या या परिसरात भेडसावत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर्षी पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतरही पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडली. या नदीच्या काठावर ५० ते ६० गावे आहेत. या गावांसाठी पैनगंगा ही जीवनदायिनी आहे. या परिसरातील शेतीसुद्धा नदी पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी लवकरच नदी कोरडी पडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता एप्रिल, मे महिन्याला वेळ असतानाही फेब्रुवारीपासूनच या गावांमध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात ती अधिकच तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती अधिकच विदारक होणार आहे. ५० ते ६० गावांतील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आतापासूनच एप्रिल, मे महिन्याचे नियोजन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. संबंधित यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)