शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या ५० गावांत टंचाई

By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST

पाणीटंचाई : पैनगंगा नदी पडली कोरडी, नागरिकांची भटकंती

उमरखेड : यावर्षी पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडल्याने या नदीकाठावरील ५० ते ६० गावांमधील नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ही समस्या या परिसरात भेडसावत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर्षी पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतरही पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडली. या नदीच्या काठावर ५० ते ६० गावे आहेत. या गावांसाठी पैनगंगा ही जीवनदायिनी आहे. या परिसरातील शेतीसुद्धा नदी पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी लवकरच नदी कोरडी पडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता एप्रिल, मे महिन्याला वेळ असतानाही फेब्रुवारीपासूनच या गावांमध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात ती अधिकच तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती अधिकच विदारक होणार आहे. ५० ते ६० गावांतील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आतापासूनच एप्रिल, मे महिन्याचे नियोजन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. संबंधित यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)