शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

ंजिल्ह्यात ३० टक्के बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: May 23, 2014 00:15 IST

जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार

यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकर्‍यांना आणखी सोयाबीन बियाण्याची गरज भासणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता कृषी विभागाकडून पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहे. बियाणे तुटवड्याची जिल्हा पातळीवर सोडवणूक करण्यासाठी कृषी अधिक्षकांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत चांगल्या उगवन शक्तीचे सोयाबीन शेतकर्‍यांकडे आरक्षीत करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकार्‍यांना दिल्या. यावर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मुळातच बियाणे कंपन्याकडे सोयाबिनचे पुरेसे बियाणे शिल्लक नाही. त्यातुन सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्यात उपाय योजनाची माहिती दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ४० गावामधील किती शेतकर्‍यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. शिल्लक असलेले सोयाबीन उगवन शक्तीस पात्र आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. असे पात्र बियाणे तुटवड्याच्या काळात शेतकर्‍यांकडून गाव पातळीवर वापरण्यात येणार आहे. सोयाबीनसोबतच आंतर पीक म्हणून तुरी, मुग, उडीदाची लागवड करण्याचे सूचविण्यात आले. आंतर पीकासोबत चांगल्या उत्पादनाकरीता बिज प्रक्रीया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.खरीप हंगामात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून भरारी पथकाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८८९ गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. तीन हजार ९२३ शेतकर्‍यांकडे कृषी विभागाने संपर्क साधला आहे. या ठिकाणावरून २४ हजार ८६३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शेतकर्‍यांच्या घरचे सोयाबीन उगवन शक्तीस पात्र ठरल्या नंतर त्या सोयाबीनवर प्रक्रीया करावी लागणार आहे. त्यासाठी थायरम आणि ट्रायकोडर्माची प्रक्रीया केल्यास बुरशी रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. जिल्हयाला लागणारे बियाणे सोयाबीन कंपनीने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. मात्र वेळेवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी खरीपाच्या पेरणी पूर्वी बैठक घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कोणतीच अडचण भासणार नाही. त्यांना दर्जेदार आणि योग्य बियाणे उपलब्ध होईल अशी तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. (शहर वार्ताहर)