शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

ंजिल्ह्यात ३० टक्के बियाणांचा तुटवडा

By admin | Updated: May 23, 2014 00:15 IST

जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार

यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी तीन लाख ९२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरीता दोन लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवशकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ७० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकर्‍यांना आणखी सोयाबीन बियाण्याची गरज भासणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता कृषी विभागाकडून पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न केले जात आहे. बियाणे तुटवड्याची जिल्हा पातळीवर सोडवणूक करण्यासाठी कृषी अधिक्षकांनी महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत चांगल्या उगवन शक्तीचे सोयाबीन शेतकर्‍यांकडे आरक्षीत करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकार्‍यांना दिल्या. यावर्षी सोयाबीनच्या पेर्‍यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मुळातच बियाणे कंपन्याकडे सोयाबिनचे पुरेसे बियाणे शिल्लक नाही. त्यातुन सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासल्यात उपाय योजनाची माहिती दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ४० गावामधील किती शेतकर्‍यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. शिल्लक असलेले सोयाबीन उगवन शक्तीस पात्र आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. असे पात्र बियाणे तुटवड्याच्या काळात शेतकर्‍यांकडून गाव पातळीवर वापरण्यात येणार आहे. सोयाबीनसोबतच आंतर पीक म्हणून तुरी, मुग, उडीदाची लागवड करण्याचे सूचविण्यात आले. आंतर पीकासोबत चांगल्या उत्पादनाकरीता बिज प्रक्रीया करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.खरीप हंगामात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाऊ नये म्हणून भरारी पथकाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८८९ गावांमध्ये सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. तीन हजार ९२३ शेतकर्‍यांकडे कृषी विभागाने संपर्क साधला आहे. या ठिकाणावरून २४ हजार ८६३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. शेतकर्‍यांच्या घरचे सोयाबीन उगवन शक्तीस पात्र ठरल्या नंतर त्या सोयाबीनवर प्रक्रीया करावी लागणार आहे. त्यासाठी थायरम आणि ट्रायकोडर्माची प्रक्रीया केल्यास बुरशी रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. जिल्हयाला लागणारे बियाणे सोयाबीन कंपनीने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. त्या दृष्टीने काम सुरू आहे. मात्र वेळेवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी खरीपाच्या पेरणी पूर्वी बैठक घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कोणतीच अडचण भासणार नाही. त्यांना दर्जेदार आणि योग्य बियाणे उपलब्ध होईल अशी तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. (शहर वार्ताहर)