शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

By admin | Updated: June 25, 2017 00:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार

कर्जमाफी : दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांकडे १ हजार ३५० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ४० हजार थकबाकीदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. त्यांच्याकडे एक हजार ७० कोटीचे कर्ज थकले आहे. ४९ हजार २६५ शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे ३४६ कोटी ८५ लाख रूपयांचे कर्ज थकले आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांकडे दीड ते दोन लाखांचे कर्ज थकले आहे. ही थकबाकी ९३८ कोटींच्या घरात आहे. दीड लाखापेक्षा अधिक रकमेची परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकेच्या ८६ हजार सभासदाकडे ४५० कोटी रूपये थकले आहे. याची अद्ययावत माहिती बँकेला प्राप्त व्हायची आहे. यामुळे इतर बँकेच्या ८६ सभासदांना याचा लाभ होणार आहे. शासकीय कर्मचारी वगळले शेती व्यवसाय करणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही शेतकरी म्हणून कर्जमाफीच्या लाभातून वगळण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधीच जबाबदार राष्ट्रीयकृत बँकांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ९ टक्केच कर्जवाटप केले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटण्याच्या मार्गावर असल्याने ते पुन्हा संकटात सापडले. राष्ट्रीयकृत बँकांच्या या निर्माण झालेल्या परिस्थितीला खुद्द लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. मंगळवार, २७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकर्स कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना आपण आडव्या हाताने घेणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या नऊ टक्के कर्जाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे यवतमाळ : खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ नऊ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचविण्यात आले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांना जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार २३४ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाने निश्चित करून दिले होते. परंतु जून संपायला आला तरी या बँकांचे पीककर्ज वाटप आतापर्यंत केवळ ११ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले आहे. त्याची टक्केवारी अवघी नऊ (१०६ कोटी) एवढी आहे. ‘लोकमत’ने शनिवारी राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या या गतीचा पर्दाफाश केला. त्याची दखल घेत किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’चे हे वृत्त थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पाठविले. कर्ज वाटपाची गती अशीच कायम राहिल्यास हजारो एकर जमीन पडिक राहण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाची गती (४८ टक्के) समाधानकारक मानली जाते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात एक पैसाही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. एवढेच काय, बी-बियाण्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दहा हजाराच्या अग्रीमचाही पत्ता नाही. दरवर्षी हजारो शेतकरी आपल्या घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. परंतु शासनाने यावर्षी कर्जमाफीची घोषणा केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही हात आखुडता घेतला आहे. पर्यायाने बँकांची थकीत कर्जाची वसुली होवू शकली नाही. त्यामुळे आता बँकांकडे कर्ज वाटपासाठी पैशांची सोय नाही.