शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सव्वालाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार

By admin | Updated: June 25, 2017 00:14 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार

कर्जमाफी : दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार शेतकऱ्यांकडे १ हजार ३५० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ४० हजार थकबाकीदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. त्यांच्याकडे एक हजार ७० कोटीचे कर्ज थकले आहे. ४९ हजार २६५ शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे ३४६ कोटी ८५ लाख रूपयांचे कर्ज थकले आहे. तर एक लाख ३० हजार शेतकऱ्यांकडे दीड ते दोन लाखांचे कर्ज थकले आहे. ही थकबाकी ९३८ कोटींच्या घरात आहे. दीड लाखापेक्षा अधिक रकमेची परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकेच्या ८६ हजार सभासदाकडे ४५० कोटी रूपये थकले आहे. याची अद्ययावत माहिती बँकेला प्राप्त व्हायची आहे. यामुळे इतर बँकेच्या ८६ सभासदांना याचा लाभ होणार आहे. शासकीय कर्मचारी वगळले शेती व्यवसाय करणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहे. तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही शेतकरी म्हणून कर्जमाफीच्या लाभातून वगळण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधीच जबाबदार राष्ट्रीयकृत बँकांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ९ टक्केच कर्जवाटप केले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटण्याच्या मार्गावर असल्याने ते पुन्हा संकटात सापडले. राष्ट्रीयकृत बँकांच्या या निर्माण झालेल्या परिस्थितीला खुद्द लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. मंगळवार, २७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकर्स कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना आपण आडव्या हाताने घेणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. राष्ट्रीयीकृत बँकांच्या नऊ टक्के कर्जाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे यवतमाळ : खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ नऊ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचविण्यात आले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकांना जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार २३४ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाने निश्चित करून दिले होते. परंतु जून संपायला आला तरी या बँकांचे पीककर्ज वाटप आतापर्यंत केवळ ११ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले आहे. त्याची टक्केवारी अवघी नऊ (१०६ कोटी) एवढी आहे. ‘लोकमत’ने शनिवारी राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपाच्या या गतीचा पर्दाफाश केला. त्याची दखल घेत किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’चे हे वृत्त थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पाठविले. कर्ज वाटपाची गती अशीच कायम राहिल्यास हजारो एकर जमीन पडिक राहण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पीककर्ज वाटपाची गती (४८ टक्के) समाधानकारक मानली जाते. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात एक पैसाही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. एवढेच काय, बी-बियाण्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दहा हजाराच्या अग्रीमचाही पत्ता नाही. दरवर्षी हजारो शेतकरी आपल्या घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात. परंतु शासनाने यावर्षी कर्जमाफीची घोषणा केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही हात आखुडता घेतला आहे. पर्यायाने बँकांची थकीत कर्जाची वसुली होवू शकली नाही. त्यामुळे आता बँकांकडे कर्ज वाटपासाठी पैशांची सोय नाही.