शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

बचत गटांकडे १३ कोटींचे कर्ज थकीत

By admin | Updated: February 9, 2015 23:20 IST

स्वयंरोजगारासाठी दिलेले कर्ज बहुतांश बचत गटांनी शेतीसाठी उपयोगात आणल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील १८ हजार बचत गटांकडे एकट्या जिल्हा बँकेचे १३ कोटी रुपये कर्ज थकीत आहे.

१८ हजार गट : जिल्हा बँकेने वाटप थांबविलेरूपेश उत्तरवार - यवतमाळ स्वयंरोजगारासाठी दिलेले कर्ज बहुतांश बचत गटांनी शेतीसाठी उपयोगात आणल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील १८ हजार बचत गटांकडे एकट्या जिल्हा बँकेचे १३ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. इतर बँकांचीही बचत गटाबाबत अशीच स्थिती आहे. कर्ज थकीत असल्याने जिल्हा बँकेने आता नव्याने कर्ज वाटप थांबविले असून यामुळे बचत गट आणखी अडचणीत आले आहे. महिलांना बचतीची सवय लागावी, त्यातून स्वयंरोजगार उभा राहावा, आर्थिक संपन्नता यावी यासाठी जिल्ह्यात बचत गट स्थापन करण्यात आले. अलिकडे या बचत गटाची चळवळ व्यापक प्रमाणात जिल्हाभर पसरली आहे. बचतगटाच्या माध्यमातून अनेकांनी उद्योग उभारत आपली प्रगती साधली आहे. जिल्ह्यात सुमारे २४ हजार बचत गट कार्यरत आहे. मात्र अलीकडे काही बचत गटांनी स्वयंरोजगाराच्या नावावर उचलेले कर्ज चक्क शेतीवर वापरल्याचे दिसून येत आहे. दोन वर्ष सलग दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बचत गटांना कर्जाची परतफेड करता आली नाही. परिणामी जिल्हा बँकेतून कर्ज घेणारे तब्बल १८ हजार बचत गट थकीतच्या यादीत गेले आहे. या बचत गटांनी आतापर्यंत १० कोटी ३७ लाख रुपयांची जिल्हा बँकेत बचत केली. त्यावर जिल्हा बँकेने १३ कोटी ६२ लाख २६ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले. यातील केवळ ७४ लाख रुपयांची वसुली झाली. उर्वरित १२ कोटी ८७ लाख ३६ हजार रुपये थकीत आहे. कर्ज वसुली होत नसल्याने जिल्हा बँकेने कर्ज वाटप थांबविले आहे. या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेला सहा वसुली अधिकारी नियुक्त करावे लागले. बहुतांश बचत गटांनी मिळालेल्या कर्जाची रक्कम शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायावर लावली. परंतु दुष्काळी परिस्थितीने शेतीसोबतच व्यवसायही अडचणीत आले. त्यामुळे कर्जाची परतफेड थांबली आहे. त्यामुळे आता बचत गटाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.