शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान

By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST

जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले

२०९ गावे : डीआरडीएच्या बैठकीत अभियानाचे नियोजनयवतमाळ : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचा जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत प्रथम टप्प्यात जिल्ह्यातील नऊ गावे निवडण्यात आली आहे. विविध विभागाच्या सहकार्याने या गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अंमलबजावणीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विनय ठमके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. वड्डेवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे आदींची उपस्थिती होती.पावसाचा प्रत्येक थेंबन्थेंब अडवून जिरविण्यासाठी हे अभियान दिशादर्शक ठरणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मजबूत व्हावे, यासाठी ग्रामपातळीवर जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहे. विविध आठ शासकीय विभागांच्या योजनांची यासाठी एकत्रिकरण केल्या जाणार आहे. या अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानासाठी जिल्ह्यातील २०९ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील ११, बाभूळगाव १०, मारेगाव १६, वणी १५, घाटंजी १३, राळेगाव १२, नेर ११, आर्णी ११, कळंब १८, केळापूर १६, दारव्हा १३, दिग्रस १२, उमरखेड १४, महागाव ११, पुसद १० तर झरी तालुक्यातील १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या २०९ गावातील सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामाला गती येणार असून गावे पाण्याच्या स्त्रोतासाठी लक्षणीय योगदान देणार आहे. (शहर प्रतिनिधी)