शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान

By admin | Updated: July 7, 2014 00:09 IST

जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले

२०९ गावे : डीआरडीएच्या बैठकीत अभियानाचे नियोजनयवतमाळ : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गावखेड्यातही जलसाक्षरतेचा अभाव आहे. आता यवतमाळ जिल्हा परिषदेने पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान हाती घेतले असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचा जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर पाणी साठवा, गाव वाचवा हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानांतर्गत प्रथम टप्प्यात जिल्ह्यातील नऊ गावे निवडण्यात आली आहे. विविध विभागाच्या सहकार्याने या गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अंमलबजावणीसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुळकर्णी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विनय ठमके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. वड्डेवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे आदींची उपस्थिती होती.पावसाचा प्रत्येक थेंबन्थेंब अडवून जिरविण्यासाठी हे अभियान दिशादर्शक ठरणार आहे. भूजल पातळी वाढविण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मजबूत व्हावे, यासाठी ग्रामपातळीवर जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहे. विविध आठ शासकीय विभागांच्या योजनांची यासाठी एकत्रिकरण केल्या जाणार आहे. या अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानासाठी जिल्ह्यातील २०९ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील ११, बाभूळगाव १०, मारेगाव १६, वणी १५, घाटंजी १३, राळेगाव १२, नेर ११, आर्णी ११, कळंब १८, केळापूर १६, दारव्हा १३, दिग्रस १२, उमरखेड १४, महागाव ११, पुसद १० तर झरी तालुक्यातील १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या २०९ गावातील सरपंच व ग्रामसेवकांची कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामाला गती येणार असून गावे पाण्याच्या स्त्रोतासाठी लक्षणीय योगदान देणार आहे. (शहर प्रतिनिधी)