शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तूर विक्रीसाठी ससेहोलपट

By admin | Updated: March 3, 2017 02:01 IST

तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल

केंद्र बंद : यंदा १० लाख क्विंटलची वाढ होण्याची अपेक्षा यवतमाळ : तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. यावर्षी जादा क्षेत्रात लागवड झाल्याने तुरीचे उत्पादन तब्बल १० लाख क्विंटलने वाढण्याचे संकेत आहे. नेमकी हीच बाब हेरून व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले आहे.यावर्षी तब्बल ६८ हजार हेक्टवर तुरीचा जादा पेरा झाला. मागीलवर्षी जिल्ह्यात एक लाख १९ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. यावर्षी ६८ हजार हेक्टरने हे क्षेत्र वाढून एक लाख ८७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला. वाढीव लागवडीमुळे यावर्षी उत्पन्नातही तब्बल १० लाख क्विंटलची वाढ होण्याचे संकेत आहे. मागीलवर्षी केवळ पाच लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. ते यावर्षी १५ लाख क्विंटल होण्याची अपेक्षा आहे. तुरीचे उत्पादन वाढण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने हमी दरात तूर खरेदीसाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले. खुल्या बाजारात केवळ ३२०० ते ३५०० रूपये प्रती क्विंटलचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. आता काही केंद्रांत बारदाना उपलब्ध नसल्याने सध्या बाभूळगाव, कळंब, आर्णी, राळेगाव आणि घाटंजी येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)बारदाणा, जागा नसल्याने खरेदी थांबलीअनेक केंद्रांवर सध्या बारदाना उपलब्ध नाही. काही ठिकाणी तूर साठविण्यासाठी गोदामात जागा नाही. त्यामुळे तूर खरेदी थांबली आहे. तथापि येत्या दोन दिवसांत सर्व केंद्रांवर बारदाना उपलब्ध होईल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच तूर ठेवण्यासाठी अतिरिक्त गोदामांना मंजुरी मागण्यात आली असून या गोदामांत ४० हजार क्विंटल तूर साठवून ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यातील शेतकरी अद्याप भीतीच्या सावटात वावरत आहे.