शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जंगलात सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:23 IST

मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे.

ठळक मुद्देकिसान सभेचे आंदोलन : वृक्षारोपणासाठी खोदण्यात येणाºया खड्ड्यांना विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे. खड्डयांसाठी वनविभागाकडून जोर जबरदस्ती केली जात असल्याने वनविभाग व शेतकरी आमने-सामने आले आहेत. मागील १५ दिवसांपासून हा संघर्ष सुरू असला तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व पारंपरिक जमाती वनोजा शिवाराअंतर्गत येत असलेल्या जंगलात शेती करून गुजरान करीत आहेत. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी सन २००६ साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत, तर न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयातसुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. एवढे कायदे व कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही कायद्याचा विरोधात जाऊन वनविभाग खड्डे खणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.वनविभागाच्या या मोहिमेला विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेचे कॉ.शंकरराव दानव यांच्या नेतृत्वात जंगलामध्ये गेल्या १५ दिवसांपासून शांततेत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविभागाने जबरीने कार्यवाही केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने शेतजमीन सोडून पडीत जमिनीवर वृक्षारोपन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्के, सुनिता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुळशिराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रूखमाबाई मोहुर्ले, ताराबाई किनाके, शकुंतला लेनगुरे आदी सहभागी झाले आहेत.आंदोलनाबाबत वनविभाग अनभिज्ञगेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा मछिंद्रा शेतशिवारात सत्याग्रह सुरू असताना वनविभाग मात्र या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील डोल, मछिंद्रा, हिवरा, वनोजा या गावांतील ३४ शेतकरी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात मारेगावचे आरएफओ जगन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे यासंदर्भात मला काहीही माहित नसल्याचे ते म्हणाले.