शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांचा जंगलात सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:23 IST

मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे.

ठळक मुद्देकिसान सभेचे आंदोलन : वृक्षारोपणासाठी खोदण्यात येणाºया खड्ड्यांना विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव तालुक्यात येणाºया वनोजा जंगलात कित्येक वर्षांपासून आदिवासी कसत असलेल्या शेतजमिनीवर वनविभागाकडून केल्या जाणाºया खड्डयांना विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात शेतकºयांनी जंगलात सत्याग्रह सुरू आहे. खड्डयांसाठी वनविभागाकडून जोर जबरदस्ती केली जात असल्याने वनविभाग व शेतकरी आमने-सामने आले आहेत. मागील १५ दिवसांपासून हा संघर्ष सुरू असला तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिंद्रा येथील आदिवासी व पारंपरिक जमाती वनोजा शिवाराअंतर्गत येत असलेल्या जंगलात शेती करून गुजरान करीत आहेत. वनजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे, यासाठी सन २००६ साली वनाधिकार कायदा तयार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत, तर न्याय मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयातसुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. एवढे कायदे व कायद्यानुरूप दावा दाखल केला असतानाही कायद्याचा विरोधात जाऊन वनविभाग खड्डे खणत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.वनविभागाच्या या मोहिमेला विरोध करण्यासाठी शेतकरी किसान सभेचे कॉ.शंकरराव दानव यांच्या नेतृत्वात जंगलामध्ये गेल्या १५ दिवसांपासून शांततेत सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविभागाने जबरीने कार्यवाही केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने शेतजमीन सोडून पडीत जमिनीवर वृक्षारोपन करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात किसन मोहुर्ले, श्रीहरी लेनगुरे, सुधाकर सोनटक्के, सुनिता मोहुर्ले, अशोक लेनगुरे, प्रकाश मालेकर, राजहंस बुजाडे, संभा मडावी, तुळशिराम तुमराम, प्रभाकर बावणे, पंचफुला मडावी, लता मालेकर, ताराबाई तुमराम, रूखमाबाई मोहुर्ले, ताराबाई किनाके, शकुंतला लेनगुरे आदी सहभागी झाले आहेत.आंदोलनाबाबत वनविभाग अनभिज्ञगेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा मछिंद्रा शेतशिवारात सत्याग्रह सुरू असताना वनविभाग मात्र या आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या आंदोलनात मारेगाव तालुक्यातील डोल, मछिंद्रा, हिवरा, वनोजा या गावांतील ३४ शेतकरी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात मारेगावचे आरएफओ जगन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे यासंदर्भात मला काहीही माहित नसल्याचे ते म्हणाले.