शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ई-पंचायतपासून सरपंच अनभिज्ञ

By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST

शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश

ई-टेंडरिंगही कळत नाही : एकच कर्मचारी पाहतो अनेक गावांचा कारभारशिवानंद लोहिया - हिवरीशासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ई-पंचायत, ई-टेंडरिंग आदी बाबी कळत नाही. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हारताळ फासला जात आहे. ई-पंचायतमुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा व गावांचा कारभार पादर्शक होण्यास मदत झाली आहे. यामुळे कामांनाही काही प्रमाणात गती मिळाली आहे. परंतु अद्यापही अपेक्षित असा निकाल ई-पंचायतचा पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे शासनाच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमध्ये या बाबत असलेले अज्ञान. याच कारणामुळे काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला असून नागरिकांना अपेक्षित असे सहकार्य अद्यापही शासकीय यंत्रणेकडून प्राप्त होत नाही. ई-पंचायत या संकल्पनेची ग्रामस्थ तर सोडाच परंतु पदाधिकाऱ्यांनाही माहिती नाही.शासनाच्या ई-पंचायत संकल्पनेपासून आजही जवळपास ५० टक्केपेक्षा अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतिमान व पादर्शक व्हावा, यासाठी ई-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ती राबविताना काही त्रुटी व तांत्रिक बाबींचा मोठ्या दिमाखाने वापर करून दुरुपयोग करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. आजही ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये ही संकल्पना योग्यरित्या पोहोचलीच नसल्याचे दिसून येते. परंतु संबंधितांकडून याबाबत देखावा मात्र करण्यात येतो. ग्रामपंचायतमधील संगणक कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डाटा आॅपरेटरला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे. ग्रामपंचायतमधील शिपाई व कारकून या नवीन तंत्रज्ञान व कार्यप्रणालीपासून अद्यापही दूर असल्याचेच सर्वत्र दिसून येते. ग्रामपंचायत निधीतून लाखो रुपये खर्चाच्या कामांचे ई-टेंडर कसे काढण्यात येते, हे आजही बऱ्याच सरपंचांना माहीत नाही. ही नवीन कार्यप्रणाली शिकून घेण्यासाठीही अशा सरपंचांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच कर्मचाऱ्याच्या भरोशावर अनेक ग्रामपंचायती असल्यामुळे सर्वत्र गोंधळ दिसून येतो. त्यामुळे लोकांची कामे होत नाही. परिणामी ई-पंचायतचा शासनाचा हेतू शंभर टक्के यशस्वी होताना दिसत नाही.