शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ई-पंचायतपासून सरपंच अनभिज्ञ

By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST

शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश

ई-टेंडरिंगही कळत नाही : एकच कर्मचारी पाहतो अनेक गावांचा कारभारशिवानंद लोहिया - हिवरीशासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ई-पंचायत, ई-टेंडरिंग आदी बाबी कळत नाही. त्यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हारताळ फासला जात आहे. ई-पंचायतमुळे राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा व गावांचा कारभार पादर्शक होण्यास मदत झाली आहे. यामुळे कामांनाही काही प्रमाणात गती मिळाली आहे. परंतु अद्यापही अपेक्षित असा निकाल ई-पंचायतचा पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे शासनाच्या ग्रामीण भागातील यंत्रणेमध्ये या बाबत असलेले अज्ञान. याच कारणामुळे काही ठिकाणी या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला असून नागरिकांना अपेक्षित असे सहकार्य अद्यापही शासकीय यंत्रणेकडून प्राप्त होत नाही. ई-पंचायत या संकल्पनेची ग्रामस्थ तर सोडाच परंतु पदाधिकाऱ्यांनाही माहिती नाही.शासनाच्या ई-पंचायत संकल्पनेपासून आजही जवळपास ५० टक्केपेक्षा अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतिमान व पादर्शक व्हावा, यासाठी ई-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ती राबविताना काही त्रुटी व तांत्रिक बाबींचा मोठ्या दिमाखाने वापर करून दुरुपयोग करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. आजही ग्रामीण भागात ग्रामपंचायतमध्ये ही संकल्पना योग्यरित्या पोहोचलीच नसल्याचे दिसून येते. परंतु संबंधितांकडून याबाबत देखावा मात्र करण्यात येतो. ग्रामपंचायतमधील संगणक कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डाटा आॅपरेटरला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे. ग्रामपंचायतमधील शिपाई व कारकून या नवीन तंत्रज्ञान व कार्यप्रणालीपासून अद्यापही दूर असल्याचेच सर्वत्र दिसून येते. ग्रामपंचायत निधीतून लाखो रुपये खर्चाच्या कामांचे ई-टेंडर कसे काढण्यात येते, हे आजही बऱ्याच सरपंचांना माहीत नाही. ही नवीन कार्यप्रणाली शिकून घेण्यासाठीही अशा सरपंचांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. एकाच कर्मचाऱ्याच्या भरोशावर अनेक ग्रामपंचायती असल्यामुळे सर्वत्र गोंधळ दिसून येतो. त्यामुळे लोकांची कामे होत नाही. परिणामी ई-पंचायतचा शासनाचा हेतू शंभर टक्के यशस्वी होताना दिसत नाही.