शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

चारही तालुक्यात संततधार

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने या चारही तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, खुनी, निर्गुडा नद्यांना पूर आला आहे. याशिवाय नवरगाव आणि सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेलया २४ तासांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला जोर नसलेल्या पावसाने सायंकाळपासून चांगलाच जोर पकडला. त्यानंतर रात्रभर सतत पाऊस कोसळत होता. आज रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. या पावसामुळे वणी तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी वर्धा नदी चांगलीच फुगली आहे. सोबतच शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदीही दुथडी भरून वाहात आहे. वर्धा नदीसोबतच निर्गुडा नदीला पूर आल्याने सोमवारी गणेश विसर्जन करताना काळजी घ्यावी लागणार आहे.मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प संततधार पावसाने तुडूंब भरला आहे. हा प्रकल्प सध्या ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे निर्गुडा नदीलाही पूर आला आहे. मारेगाव तालुक्यातील इतर सर्व नालेही पावसाने तुडूंब भरले आहेत. झरीजामणी तालुक्यातही हिच स्थिती आहे. तालुक्यातील सर्व छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रविवारी ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही.पांढरकवडा तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीही दुथडी भरून वाहात आहे. या नदीला पूर आला आहे. संततधार पावसाने शनिवारी सायंकाळपासूनच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला होता. याशिवाय खुनी नदीलाही पूर आला आहे. ही नदी दुथडी भरून वाहात आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावीत झाली आहे. याशिवाय तालुक्यातील सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. या धरणातून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह वाहात आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा या चारही तालुक्यात रविवारी पावसाने कहर केला. संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम पडला. महामंडळाच्या अनेक बस विलंबाने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. अनेक प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले होते. पाऊस थांबत नसल्याने अनेकांना परत जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. संततधार पावसाने या चारही तालुक्यातील पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. सुरूवातीला दडी मारलेल्या पावसाने पोळ्यापासून दमदार पुनरागमन केले होते. सतत चार दिवस पाऊस पडत होता. त्यानंतर जवळपास तीन ते चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शनिवारपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. त्याचा परिणामी जनीजीवनावर झाला. मात्र सुटीचा दिवस असल्याने बच्चे कंपनी व कर्मचाऱ्यांना पावसापासून दिलासा मिळाला. (कार्यालय प्रतिनिधी)