शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिल्ह्यात संततधार

By admin | Updated: July 11, 2016 02:12 IST

गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार यवतमाळ : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून संततधार पावसाला प्रारंभ झाला. गत ४८ तासात पावसाने क्षणाचीही उसंत घेतली नाही. धो-धो बरसणाऱ्या या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी २५ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत मासिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महागाव तालुक्यात ४२ मिमी झाला असून यवतमाळ १३.२, बाभूळगाव ७, कळंब ६, आर्णी २०, दारव्हा ६, दिग्रस १६, नेर १३, पुसद ३७, उमरखेड ३२, केळापूर २७, राळेगाव ९, घाटंजी ४०, वणी ४१, मारेगाव २६, झरी ५१ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. पैनगंगा, वर्धा यासह जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरत वाहत असून नाल्यांना आलेल्या पुरामुळे पुसद-उमरखेड मार्ग दहागावजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला होता. सायंकाळपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर पुसद-महागाव हा रस्ता गुंज नाल्याला आलेल्या पुराने ठप्प झाला आहे. तसेच महागाव-करंजखेड येथे नाल्याच्या पुलावरही पाणी वाहत होते. पुसद तालुक्यातील बेलोरा खुर्द ते बेलोरा या मार्गावरील नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. पैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष नजर ठेऊन आहे. तहसीलदार आणि गावातील संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्प तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. प्रकल्पात एक हजार २७३ फूट जलसाठा निर्माण झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लो होण्यासाठी एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यवतमाळकरांना दिलासा मिळणार असून आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा केला जाईल. लवकरच सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.