शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

बचत गटांमुळे शेतकऱ्यांना संजीवनी

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास

नांदेपेरा : ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास कमी झाला आहे. शिवाय कुटुंबातील आर्थिक कामे सहजरीतीने होताना दिसत आहे़ गेल्या काही वर्षांपूर्वी बँकांकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जाऊन त्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते़ त्याचाच फायदा घेत सावकार शेतकऱ्याला अव्वाच्या-सव्वा व्याज आकारून कर्ज देत होते. त्यातच जमानत म्हणून शेतीसुद्धा गहाण करून घेत होते. त्याबाबत लेखी स्वरूपात करारनामा करून घेतला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा सावकारांनी गिळंकृत केल्या आहेत. मात्र आता ग्रामीण भागात महिला, पुरूष यांनी एकत्रित येऊन बचत गटांची निर्मिती केल्याने सावकारांना बराच चाप बसला आहे. बचत गटांमुळे बँकेत खाते उघडून व्यवहार गावातच होताना दिसत आहे़ त्यामुळे आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे़ बचत गटांना बँकेकडूनही कर्ज मिळत असल्याने अनेक बचत गटांनी गावातच काही लघु व्यवसाय सुरू केले आहे़ त्यामुळे महिलांना या बचत गटांद्वारे गावातच रोजगारही मिळाला आहे़ पुरूषांच्या बचत गटांपेक्षा महिला गटांची सरशी दिसून येत आहे़ बचत गटाची निर्मिती झाली़ या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. या बचत गटांना पुढे नेण्याकरिता पंचायत समितीमध्ये गटांना प्रशिक्षण देण्याकरिता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुरेशा प्रमाणात सहकार्य मिळात नसल्याचे काही महिला बचत गटांच्या सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बचत गटांना बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (वार्ताहर)