शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बचत गटांमुळे शेतकऱ्यांना संजीवनी

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास

नांदेपेरा : ग्रामीण भागात बचत गट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या बचत गटांच्या माध्यमांतून गावातल्या गावातच आर्थिक देवाण- घेवाण होत असल्याने कागदपत्रे जमा करणे, बँकेत चकरा मारण्याा त्रास कमी झाला आहे. शिवाय कुटुंबातील आर्थिक कामे सहजरीतीने होताना दिसत आहे़ गेल्या काही वर्षांपूर्वी बँकांकडून कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकारांच्या दरवाजात जाऊन त्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते़ त्याचाच फायदा घेत सावकार शेतकऱ्याला अव्वाच्या-सव्वा व्याज आकारून कर्ज देत होते. त्यातच जमानत म्हणून शेतीसुद्धा गहाण करून घेत होते. त्याबाबत लेखी स्वरूपात करारनामा करून घेतला जात होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसुद्धा सावकारांनी गिळंकृत केल्या आहेत. मात्र आता ग्रामीण भागात महिला, पुरूष यांनी एकत्रित येऊन बचत गटांची निर्मिती केल्याने सावकारांना बराच चाप बसला आहे. बचत गटांमुळे बँकेत खाते उघडून व्यवहार गावातच होताना दिसत आहे़ त्यामुळे आर्थिक व्यवहाराचे चित्र बदलत चालले आहे़ बचत गटांना बँकेकडूनही कर्ज मिळत असल्याने अनेक बचत गटांनी गावातच काही लघु व्यवसाय सुरू केले आहे़ त्यामुळे महिलांना या बचत गटांद्वारे गावातच रोजगारही मिळाला आहे़ पुरूषांच्या बचत गटांपेक्षा महिला गटांची सरशी दिसून येत आहे़ बचत गटाची निर्मिती झाली़ या बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. या बचत गटांना पुढे नेण्याकरिता पंचायत समितीमध्ये गटांना प्रशिक्षण देण्याकरिता कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुरेशा प्रमाणात सहकार्य मिळात नसल्याचे काही महिला बचत गटांच्या सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बचत गटांना बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. (वार्ताहर)