शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या वाहनांनी ग्रामीण रस्त्यांची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ असे लेखी आदेश बांधकाम विभागाला दिल्याशिवाय रेतीघाटांचा लिलाव केला जाऊ नये, अशी मागणी डाॅ.राऊत यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मोठ्या नद्यांवर असलेल्या रेतीघाटांच्या दिशेने जाणारे रस्ते खाचखळग्यांचे बनले आहे. रेती वाहतुकीच्या वाहनामुळे या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जवळपास ३० किलोमीटरचा मार्ग अतिशय कठीण झाला आहे. मार्गाची वहनक्षमता विचारात न घेता होत असलेल्या वाहतुकीमुळे या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. रेती वाहतुकीसाठी अनेक ठिकाणी घाट परिसरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. बहुतांश रस्ते ग्रामपंचायत क्षेत्रात येतात. या रस्त्यांची वहनक्षमता कमी असते. असे असतानाही तेथून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ राहते. हीच बाब या रस्त्याचे आयुष्यमान कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ असे लेखी आदेश बांधकाम विभागाला दिल्याशिवाय रेतीघाटांचा लिलाव केला जाऊ नये, अशी मागणी डाॅ.राऊत यांनी केली आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे सावळी सदोबा परिसरातील ७५ किलोमीटर रस्त्याची चाळण झाल्याची बाब दोन वर्षांपूर्वी डाॅ.राऊत यांनी प्रशासनाकडे मांडली होती. या प्रकरणात अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीसही दिल्या गेल्या. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता राॅयल्टीतून एक रुपयाही खर्च न केल्याची बाब डाॅ.राऊत यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या निदर्शनास आणून दिली. 

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीजिल्ह्यातील ३४ रेतीघाटांच्या लिलावाची जनसुनावणी बुधवार, १० नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील दक्ष नागरिकांनी आपल्या आक्षेप नोंदवावे, असे आवाहन डाॅ.प्रदीप राऊत यांनी केले आहे. करोडो रुपयांच्या सार्वजनिक मार्गाचे नुकसान करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, आजवर कुणालाही दंड न केल्याचे डाॅ.राऊत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :sandवाळूroad transportरस्ते वाहतूक