शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समृद्धीला ग्रामपंचायतींचीच आडकाठी

By admin | Updated: August 1, 2015 03:43 IST

येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली.

सुशील निकोडे  वणीयेथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला ११ ग्रामपंचायतींनीच आडकाठी निर्माण केली. केवळ दोन ग्रामपंचायती या योजनेत पात्र ठरल्या आहे. या १३ ग्रामपंचायतींनी योजनेवर १३ लाख ५१ हजार १३१ रूपयांचा निधी खर्च केला आहे.राज्य शासनातर्फे पंचायत समितीमार्फत सन २०११-१२ या वर्षांत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. त्यात तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा, चिखली व टाकळी या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायतीने तिनही वर्षांचे निकष पूर्ण केले आहे. त्यामुळे चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायती समृद्धी योजनेस पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना शासनातर्फे रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्याने त्या पुरस्कारापासून वंचित राहणार आहे.सन २०११-१२ मध्ये गावात ५० टक्के झाडे लावणे, झाडांना संरक्षण गार्ड लावणे, गावात ६० टक्के शौचालयांचे बांधकाम करणे, ६० टक्के कर वसुली करणे, गावात प्लॉस्टिक वापरावर बंदी आणणे, प्लॅस्टीक पिशव्यांची विल्हेवाट लावणे, गावात पर्यावरणपूरक मूर्ती बनवून तिचे विसर्जन करणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेणे, यशवंत पंचायत राजमध्ये ५० टक्के सहभाग घेणे आदी निकष प्रथम वर्षासाठी होते. हे निकष तालुक्यातील १३ ही ग्रामपंचायतींनी प्रथम वर्षी पूर्णपणे पार पाडले. दुसऱ्या वर्षात सन २०१२-१३ मध्ये ७५ टक्के झाडे लावणे, ७० टक्के शौचालय बांधणे, ८० टक्के कर वसुली करणे, गाव प्लॅस्टीकमुक्त करणे, प्लॅस्टीक पिशव्यांची प्रत्यक्ष विल्हेवाट लावणे व प्रत्यक्ष मातीची मूर्ती बनवून ती विसर्जीत करणे, १०० टक्के घनकचऱ्याचे नियोजन करणे आदी निकष पूर्ण करावयाचे होते. मात्र तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा या ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्यामुळे त्या या योजनेतून बाद झाल्या. केवळ चिखली व टाकळी या दोनच ग्रमपंचायत्तींनी हे निकष पूर्ण केले आहे.त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये या दोन्ही ग्रामपंचायतींनी तिसऱ्या वर्षातील अगदी कठीण निकषही पूर्ण केले आहे. आता ही दोनही गावे समृद्धी ग्राम योजनेसाठी पात्र ठरली आहेत. तसेच हे दोन्ही गाव आता आदर्श ग्राम बनण्याच्या वाटेवर आहे. या दोन्ही गावांत १०० टक्के झाडे लावण्यात आली. तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले. गावात प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी टाळण्यात आला. स्वच्छता अभियान १०० टक्के राबविले. गावात ५० टक्के खताची निर्मिती केली. ही सर्व कामे या ग्रामपंचायतींनी पूर्ण केली. त्यामुळे त्या पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी या योजनेचे निकळच पूर्ण केले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी व्यर्थ गेल्याचे दिसत आहे.