शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

समृद्धीला ग्रामपंचायतींचीच आडकाठी

By admin | Updated: August 1, 2015 03:43 IST

येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली.

सुशील निकोडे  वणीयेथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला ११ ग्रामपंचायतींनीच आडकाठी निर्माण केली. केवळ दोन ग्रामपंचायती या योजनेत पात्र ठरल्या आहे. या १३ ग्रामपंचायतींनी योजनेवर १३ लाख ५१ हजार १३१ रूपयांचा निधी खर्च केला आहे.राज्य शासनातर्फे पंचायत समितीमार्फत सन २०११-१२ या वर्षांत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. त्यात तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा, चिखली व टाकळी या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायतीने तिनही वर्षांचे निकष पूर्ण केले आहे. त्यामुळे चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायती समृद्धी योजनेस पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना शासनातर्फे रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्याने त्या पुरस्कारापासून वंचित राहणार आहे.सन २०११-१२ मध्ये गावात ५० टक्के झाडे लावणे, झाडांना संरक्षण गार्ड लावणे, गावात ६० टक्के शौचालयांचे बांधकाम करणे, ६० टक्के कर वसुली करणे, गावात प्लॉस्टिक वापरावर बंदी आणणे, प्लॅस्टीक पिशव्यांची विल्हेवाट लावणे, गावात पर्यावरणपूरक मूर्ती बनवून तिचे विसर्जन करणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेणे, यशवंत पंचायत राजमध्ये ५० टक्के सहभाग घेणे आदी निकष प्रथम वर्षासाठी होते. हे निकष तालुक्यातील १३ ही ग्रामपंचायतींनी प्रथम वर्षी पूर्णपणे पार पाडले. दुसऱ्या वर्षात सन २०१२-१३ मध्ये ७५ टक्के झाडे लावणे, ७० टक्के शौचालय बांधणे, ८० टक्के कर वसुली करणे, गाव प्लॅस्टीकमुक्त करणे, प्लॅस्टीक पिशव्यांची प्रत्यक्ष विल्हेवाट लावणे व प्रत्यक्ष मातीची मूर्ती बनवून ती विसर्जीत करणे, १०० टक्के घनकचऱ्याचे नियोजन करणे आदी निकष पूर्ण करावयाचे होते. मात्र तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा या ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्यामुळे त्या या योजनेतून बाद झाल्या. केवळ चिखली व टाकळी या दोनच ग्रमपंचायत्तींनी हे निकष पूर्ण केले आहे.त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये या दोन्ही ग्रामपंचायतींनी तिसऱ्या वर्षातील अगदी कठीण निकषही पूर्ण केले आहे. आता ही दोनही गावे समृद्धी ग्राम योजनेसाठी पात्र ठरली आहेत. तसेच हे दोन्ही गाव आता आदर्श ग्राम बनण्याच्या वाटेवर आहे. या दोन्ही गावांत १०० टक्के झाडे लावण्यात आली. तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले. गावात प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी टाळण्यात आला. स्वच्छता अभियान १०० टक्के राबविले. गावात ५० टक्के खताची निर्मिती केली. ही सर्व कामे या ग्रामपंचायतींनी पूर्ण केली. त्यामुळे त्या पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी या योजनेचे निकळच पूर्ण केले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी व्यर्थ गेल्याचे दिसत आहे.