शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीला ग्रामपंचायतींचीच आडकाठी

By admin | Updated: August 1, 2015 03:43 IST

येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली.

सुशील निकोडे  वणीयेथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला ११ ग्रामपंचायतींनीच आडकाठी निर्माण केली. केवळ दोन ग्रामपंचायती या योजनेत पात्र ठरल्या आहे. या १३ ग्रामपंचायतींनी योजनेवर १३ लाख ५१ हजार १३१ रूपयांचा निधी खर्च केला आहे.राज्य शासनातर्फे पंचायत समितीमार्फत सन २०११-१२ या वर्षांत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. त्यात तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा, चिखली व टाकळी या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायतीने तिनही वर्षांचे निकष पूर्ण केले आहे. त्यामुळे चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायती समृद्धी योजनेस पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना शासनातर्फे रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्याने त्या पुरस्कारापासून वंचित राहणार आहे.सन २०११-१२ मध्ये गावात ५० टक्के झाडे लावणे, झाडांना संरक्षण गार्ड लावणे, गावात ६० टक्के शौचालयांचे बांधकाम करणे, ६० टक्के कर वसुली करणे, गावात प्लॉस्टिक वापरावर बंदी आणणे, प्लॅस्टीक पिशव्यांची विल्हेवाट लावणे, गावात पर्यावरणपूरक मूर्ती बनवून तिचे विसर्जन करणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेणे, यशवंत पंचायत राजमध्ये ५० टक्के सहभाग घेणे आदी निकष प्रथम वर्षासाठी होते. हे निकष तालुक्यातील १३ ही ग्रामपंचायतींनी प्रथम वर्षी पूर्णपणे पार पाडले. दुसऱ्या वर्षात सन २०१२-१३ मध्ये ७५ टक्के झाडे लावणे, ७० टक्के शौचालय बांधणे, ८० टक्के कर वसुली करणे, गाव प्लॅस्टीकमुक्त करणे, प्लॅस्टीक पिशव्यांची प्रत्यक्ष विल्हेवाट लावणे व प्रत्यक्ष मातीची मूर्ती बनवून ती विसर्जीत करणे, १०० टक्के घनकचऱ्याचे नियोजन करणे आदी निकष पूर्ण करावयाचे होते. मात्र तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा या ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्यामुळे त्या या योजनेतून बाद झाल्या. केवळ चिखली व टाकळी या दोनच ग्रमपंचायत्तींनी हे निकष पूर्ण केले आहे.त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये या दोन्ही ग्रामपंचायतींनी तिसऱ्या वर्षातील अगदी कठीण निकषही पूर्ण केले आहे. आता ही दोनही गावे समृद्धी ग्राम योजनेसाठी पात्र ठरली आहेत. तसेच हे दोन्ही गाव आता आदर्श ग्राम बनण्याच्या वाटेवर आहे. या दोन्ही गावांत १०० टक्के झाडे लावण्यात आली. तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले. गावात प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी टाळण्यात आला. स्वच्छता अभियान १०० टक्के राबविले. गावात ५० टक्के खताची निर्मिती केली. ही सर्व कामे या ग्रामपंचायतींनी पूर्ण केली. त्यामुळे त्या पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी या योजनेचे निकळच पूर्ण केले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी व्यर्थ गेल्याचे दिसत आहे.