शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

वाहतूक व्यवस्था सुधारा संभाजी ब्रिगेडचा ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

यवतमाळ शहरातील बसस्थानक आर्णी मार्गावर स्थानांतरित केले. तेथे रस्त्याच्या मधोमधच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला इतर वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे याठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानक चौकातही विकास कामांमुळे बंद केलेले सिग्नल अद्यापही सुरू नाहीत. त्यातच बसस्थानक चौकात वाहतूक वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देशहरातील गोंधळ : रस्त्यांची कामे व बसस्थानक बदलल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरातील अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कोणते वाहन कुठल्या रस्त्याने जाणार हे निश्चित नाही. यातच रस्त्यांवर विविध प्रकारचे अतिक्रमण वाढले आहे. अनेक सार्वजनिक कार्यालय व खासगी प्रतिष्ठानांना पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने ठेवावी लागत आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतुकीची व्यवस्था तत्काळ सुधारावी यासाठी संभाजी ब्रिगेडने इशारा दिला आहे.यवतमाळ शहरातील बसस्थानक आर्णी मार्गावर स्थानांतरित केले. तेथे रस्त्याच्या मधोमधच बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला इतर वाहनांची रांग लागलेली असते. यामुळे याठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानक चौकातही विकास कामांमुळे बंद केलेले सिग्नल अद्यापही सुरू नाहीत. त्यातच बसस्थानक चौकात वाहतूक वळविण्यात आली आहे. अशा स्थितीत जड वाहने गावात आल्यानंतर मोठी अडचण निर्माण होते. खासगी प्रवासी वाहने, ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. जिल्हा परिषदेसमोर, दारव्हा मार्गावर, नाट्यगृह परिसरासमोर, अभ्यंकर कन्या शाळेसमोर या वाहनांचा ठिय्या असतो. मुख्य बाजारपेठेतही अनेक दुकानांना व व्यापारी संकुलांना नियम असतानाही पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. काहींनी तर जाणीवपूर्वक दुकाने रस्त्यावर मांडली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. बाजारात खरेदीसाठी निघाल्यानंतर वाहन रस्त्यावर उभे ठेवावे लागते. नो पार्किंग जागेत वाहन ठेवले म्हणून पोलीस त्याला टो करून नेतात. याचा आर्थिक भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. बँकांसह अनेक सार्वजनिक कार्यालयांसमोरही पार्किंगची व्यवस्थाच नाही. याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन वाहतूक व्यवस्था व पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, सचिन मनोहर, स्वप्नील खोब्रागडे, भरत सकट, रिंकू शंभरकर, अनिकेत मेश्राम, किशोर ठाकरे, प्रशांत ठाकरे, किशोर चव्हाण, विक्की सुरोशे, स्वप्नील मानवतकर यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे जमादार यशपाल ठाकूर यांना निवेदन दिले आहे. 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड