शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

रस्त्यासाठी साखरा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:26 IST

हा रस्ता गावाचा मुख्य रस्ता आहे. गावकऱ्यांना या रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांना हाच रस्ता ...

हा रस्ता गावाचा मुख्य रस्ता आहे. गावकऱ्यांना या रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांना हाच रस्ता जोडतो. अंगणवाडी केंद्र, सहकारी बँक, सरकारी रेशन केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, बसस्थानक, दूध संकलन केंद्रसुद्धा याच रस्त्यावर आहे.

या रस्त्याला गावामध्ये दोन ठिकाणी धोक्याचे वळण आहे. अंगणवाडी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, बँक ग्राहक, शेतकरी, शेतमजूर, गावातील गुरेढोरांना हाच मुख्य रस्ता असल्यामुळे येणे-जाणे करावे लागते. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा रस्ता गावातून असल्यामुळे वाहतूक व वर्दळ वाढली. वारंवार अपघाताच्या घटना घडतात. २०१८ मध्ये बस व दुचाकीचा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. त्यावेळी प्रशासन व नागरतंमध्ये संघर्ष झाला होता.

गावातून गेलेला घाटंजी ते पांढरकवडा मार्ग सुमारे ४० वर्षांपूर्वी १९७८ ते १९७९ मध्ये केवळ २५ फूट रुंदीचा तयार झाला होता. दुष्काळी काम म्हणून या रस्त्याची निर्मिती झाली होती. नंतर १९९० मध्ये रस्त्याचे डांबरीकरण होऊन पांढरकवडापर्यंत रस्ता जोडण्यात आला. २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातून गेलेल्या रस्त्याला बायपास मार्गाचा पर्याय न करता याच रस्त्याचे दुपदरीकरण केले. त्यावेळी रस्त्याची रुंदी वाढल्याने रस्त्यालगतची जागा व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते. सध्या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे.

बॉक्स

ग्रामसभेने पारित केला ठराव

गावातून या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास वाहतूक व वर्दळ वाढेल. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल. रस्त्याच्या काठावरील रहिवासी नागरिकांचे जागा व मालमत्तेचे नुकसान होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी साखरा (खुर्द) या गावातून गेलेल्या या रस्त्यासाठी बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीने तसा ग्रामसभेचा सोचा ठराव सादर केला आहे.