शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा नायगारा असलेला सहस्रकुंड धबधबा उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

अविनाश खंदारे उमरखेड : विदर्भाचा नायगारा अशी ओळख असलेला पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा विकासापासून वंचित आहे. उमरखेड तालुक्यातील या ...

अविनाश खंदारे

उमरखेड : विदर्भाचा नायगारा अशी ओळख असलेला पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा विकासापासून वंचित आहे. उमरखेड तालुक्यातील या भागात निर्सगरम्य परिरसर आहे. मात्र, विकासाअभावी हा संपूर्ण परिसर भकास ठरला आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर हा धबधबा आहे. परिसर वैभवसंपन्न आणि मनमोहक आहे. लगतच पैनगंगा अभयारण्य आहे. या परिसरात विपुल वनराई, हिरवागार निसर्ग, वनश्रीने भरगच्च डोंगरमाथे व दर्‍या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी कोसळणारे धबधबे दिसतात. हे सारे दृश्य मनाला खूप सुखद वाटते. मात्र, ज्यावेळी पर्यटक सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येतात, त्यावेळी संपूर्णपणे पर्यटकांचा हिरमोड होतो.

धबधबा अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा धबधबा आणि परिसराची अवस्था दयनीय झाली आहे. तेथील बागेत कचरा, तणकट, गाजर गवत वाढले आहे. पर्यटकांसाठी असणाऱ्या सुरक्षा छतांची अवस्था स्मशानभूमीसारखी झाली आहे. केवळ अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या ओल्या पार्टीसाठीच हे ठिकाण बनले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य पर्यटकांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश नाकारला जातो.

महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह नाही. कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. बसण्याची सुविधा नाही. धबधबा पाहणे आणि परत जाणे, एवढेच पर्यटकांच्या नशिबी उरले आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सहस्रकुंड उपेक्षित आहे. या बंदी भागातील गाव, खेड्यांचा विकासही खुंटला आहे. परिणामी पर्यटक मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर संकुल पर्यटन स्थळाकडे धाव घेत आहे. विपुल वनसंपदा, निसर्गरम्य परिसर असूनही तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसर उपेक्षित आहे. सहस्रकुंड धबधबा आणि पैनगंगा अभयारण्य परिसराचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगारही मिळण्याची शक्यता आहे.

बॉक्स

तालुक्यातील ढाणकी ते सहस्त्रकुंडचे अंतर २५ कीलोमीटर आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हे अंतर कापण्यासाठी तबब्ल तीन तास लागतात. त्यात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकाला कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे की अपघात घडेल याचा नेम नसतो. सहस्त्रकुंड धबधबा बंदी भागातील गावांना जोडणारा दुवा आहे. मात्र, रस्ते कधी सुधारणार? असा प्रश्न आहे.