शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

निर्धुर ग्राम

By admin | Updated: June 5, 2016 02:09 IST

पर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे.

पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड बनले रुपेश उत्तरवार यवतमाळपर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पर्यावरणाशी समरस झालेली काही गावे आदर्श म्हणून पुढे आली आहेत. यवतमाळ वनवृत्तातील पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड गाव वनग्राम म्हणून घोषित झाले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबात आज गॅस सिलिंडर आहे. त्याचा नित्यनियमाने वापर झाल्याने हे गाव निर्धुर ग्राम बनले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०४० गावांपैकी आर्णी तालुक्यातील पिंपळनेर, यवतमाळ तालुक्यातील सायखेडा बंदी आणि नेर तालुक्यातील मालखेड खुर्द या गावांनी एक नवा आदर्श जिल्ह्यापुढे निर्माण केला आहे. २०१४ पासून या गावांचा कायापालट झाला आहे. ही गावे जंगलात असली तरी यांच्याकडे जलतनासाठी लाकूड वापरले जात नाही. त्याऐवजी आता गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे.त्याकरिता ग्रामसभेने ठराव घेतला आणि संपूर्ण गावाने सिलिंडर वापरण्याचा निर्णय घेतला. वनविभागाने यासाठी गावाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये २५ टक्के निधी लाभार्थी आणि ७५ टक्के वाटा वनविभागाने उचलला आहे. यामुळे आज या ठिकाणी घरोघरी सिलिंडर दिसतात. यातून संपूर्ण गाव निर्धुर झाले आहे. गाव इतक्यावरच थांबले नाही, तर गावाने कुऱ्हाड बंदी, चराई बंदी आणि वनव्यापासून सदैव जंगलांना वाचविण्याचे काम केले आहे. जंगलाप्रती त्यांच्यामध्ये असलेले उत्कट प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येते. यासोबतच गावकऱ्यांनी जंगलामध्ये वृक्षलागवड केली आहे. आज जंगलातील हे टुमदार गाव पर्यटनस्थळालाही लाजवेल असेच आहे. या ठिकाणी मोर, लांडोर, हरिण, नीलगाय आणि इतर प्राणी जवळून पाहायला मिळतात. जणू हे प्राणी आणि ग्रामस्थ एकाच परिवारातील असावे असाच अनेकवेळा भास होतो. त्यांनी हाती घेतलेला पर्यावरण संवर्धनाचा विडा अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.