शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

निर्धुर ग्राम

By admin | Updated: June 5, 2016 02:09 IST

पर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे.

पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड बनले रुपेश उत्तरवार यवतमाळपर्यावरणाच्या असमतोलाने संपूर्ण जगभरात ग्लोबल वार्मिंगचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पर्यावरणाशी समरस झालेली काही गावे आदर्श म्हणून पुढे आली आहेत. यवतमाळ वनवृत्तातील पिंपळनेर, सायखेडा बंदी आणि मालखेड गाव वनग्राम म्हणून घोषित झाले आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबात आज गॅस सिलिंडर आहे. त्याचा नित्यनियमाने वापर झाल्याने हे गाव निर्धुर ग्राम बनले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २०४० गावांपैकी आर्णी तालुक्यातील पिंपळनेर, यवतमाळ तालुक्यातील सायखेडा बंदी आणि नेर तालुक्यातील मालखेड खुर्द या गावांनी एक नवा आदर्श जिल्ह्यापुढे निर्माण केला आहे. २०१४ पासून या गावांचा कायापालट झाला आहे. ही गावे जंगलात असली तरी यांच्याकडे जलतनासाठी लाकूड वापरले जात नाही. त्याऐवजी आता गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे.त्याकरिता ग्रामसभेने ठराव घेतला आणि संपूर्ण गावाने सिलिंडर वापरण्याचा निर्णय घेतला. वनविभागाने यासाठी गावाला मदतीचा हात दिला आहे. यामध्ये २५ टक्के निधी लाभार्थी आणि ७५ टक्के वाटा वनविभागाने उचलला आहे. यामुळे आज या ठिकाणी घरोघरी सिलिंडर दिसतात. यातून संपूर्ण गाव निर्धुर झाले आहे. गाव इतक्यावरच थांबले नाही, तर गावाने कुऱ्हाड बंदी, चराई बंदी आणि वनव्यापासून सदैव जंगलांना वाचविण्याचे काम केले आहे. जंगलाप्रती त्यांच्यामध्ये असलेले उत्कट प्रेम त्यांच्या कार्यातून दिसून येते. यासोबतच गावकऱ्यांनी जंगलामध्ये वृक्षलागवड केली आहे. आज जंगलातील हे टुमदार गाव पर्यटनस्थळालाही लाजवेल असेच आहे. या ठिकाणी मोर, लांडोर, हरिण, नीलगाय आणि इतर प्राणी जवळून पाहायला मिळतात. जणू हे प्राणी आणि ग्रामस्थ एकाच परिवारातील असावे असाच अनेकवेळा भास होतो. त्यांनी हाती घेतलेला पर्यावरण संवर्धनाचा विडा अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.