शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

सदाभाऊंच्या सरबत्तीने वळली बोबडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:05 IST

फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली.

ठळक मुद्देलोणबेहळ येथे गावकºयांशी संवाद : कृषी सहायक गावात येतो काय ?

राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली. कृषी सहायकाला ओळखता काय, तो नियमित गावात येतो काय, असे प्रश्न विचारून त्यांनी कर्मचाºयांची पंचाईत केली. सारवासारव करण्याचा अधिकाºयांचा प्रयत्नही गावकºयांनी हाणून पाडला.सदाभाऊ खोत यांचा ताफा दुपारी लोणबेहळमध्ये धडकला. येथील फाट्यावर एका कॉप्लेक्समध्ये त्यांनी थोडावेळ ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात ग्रामस्थांनी लोडशेडींग, रस्ते, आॅनलाईन आदी समस्या मांडल्या. नंतर त्यांचा ताफा शेंदुरसनीकडे वळला. तेथे फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या दीपक शामराव मडावी यांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर पुन्हा त्यांचा ताफा परत थेट लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकला. तेथे त्यांनी विषबाधेने कुणी दाखल आहे का, याची पाहणी केली. नंतर ते येथील ग्रामपंचायतीत पोहोचले.ग्रामपांयतीत त्यांनी छोटेखानी बैठक घेतली. यावेळी पूर्ण यंत्रणा उपस्थित होती. खोत यांनी उपस्थितांना तुम्ही कृषी सहायकाला ओळखता का, असा थेट प्रश्न केला. त्यावर एकाने ‘हो’ असे उत्तर दिले. मात्र ते खोत यांना रूचलेही नाही अन् पचलेही नाही, हे त्यांच्या चेहºयावरून स्पष्टपणे जाणवत होते. त्याचवेळी त्यांनी तेथून गावातील रंजनाबाई भगत यांच्या घरी शौचालयाचे भूमिपूजन करण्यासाठी प्रस्थान केले. रस्त्याने जाताना-येताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावेळी मात्र त्यांना खरे उत्तर मिळाले. ग्रामस्थांनी त्यांना चक्क कृषी सहायकाला ओखळत नाही म्हणून सांगून टाकले. त्यांना कधी पाहिले नाही, त्यांचे नावही माहिती नाही, ते कधी येतही नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.कृषी सहायक गावात येतच नसल्याचे कळताच खोत यांनी तलाठ्याबाबत विचारपूस केली. त्यांच्याबद्दलही ग्रामस्थांनी तीच माहिती दिली. नंतर ग्रामसेवकाला याची रजिस्टरमध्ये नोंद घेता का, अशी विचारणा केली. ग्रामसेवकाने असे कोणतेच रजिस्टर नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे खोत यांचा पारा भडकला. त्यांनी अखेर तालुका कृषी अधिकाºयांना रोजनिशी दाखविण्याचे निर्देश दिले. मात्र कृषी अधिकाºयाजवळ रोजनिशीच नव्हती. ती घरी विसरल्याचे त्यांनी ठोकून दिले. यावरून सर्व प्रकार खोत यांच्या लक्षात आला. त्यांनी तहसीलदारांना या सर्व प्रकाराबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल ग्रामविकास विभागाला पाठविला जाणार असून कृषी विभागाशी संबंधित कर्मचाºयांवर थेट कृषी राज्यमंत्री खोत कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवायापुढे ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवून त्यात गावात येणाºया कर्मचाºयांच्या नोंदी ठेवा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री खोत यांनी दिले. कृषी सहायक, तलाठी यांच्या भेटीचे दिवस निश्चित करा. ते त्यानुसार येतात का, याची नोंद ठेवा, असेही त्यांनी बजावले. खोत यांच्या आगळ्यावेगळ्या दौºयाने कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे. त्यापैकी कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते, याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.