शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंच्या सरबत्तीने वळली बोबडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:05 IST

फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली.

ठळक मुद्देलोणबेहळ येथे गावकºयांशी संवाद : कृषी सहायक गावात येतो काय ?

राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : फवारणीमुळे विषबाधित शेतकºयांच्या भेटीसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लोणबेहळच्या ग्रामस्थांना विचारलेल्या प्रश्नांवरून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाºयांची बोबडी वळली. कृषी सहायकाला ओळखता काय, तो नियमित गावात येतो काय, असे प्रश्न विचारून त्यांनी कर्मचाºयांची पंचाईत केली. सारवासारव करण्याचा अधिकाºयांचा प्रयत्नही गावकºयांनी हाणून पाडला.सदाभाऊ खोत यांचा ताफा दुपारी लोणबेहळमध्ये धडकला. येथील फाट्यावर एका कॉप्लेक्समध्ये त्यांनी थोडावेळ ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात ग्रामस्थांनी लोडशेडींग, रस्ते, आॅनलाईन आदी समस्या मांडल्या. नंतर त्यांचा ताफा शेंदुरसनीकडे वळला. तेथे फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या दीपक शामराव मडावी यांच्या घरी त्यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर पुन्हा त्यांचा ताफा परत थेट लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकला. तेथे त्यांनी विषबाधेने कुणी दाखल आहे का, याची पाहणी केली. नंतर ते येथील ग्रामपंचायतीत पोहोचले.ग्रामपांयतीत त्यांनी छोटेखानी बैठक घेतली. यावेळी पूर्ण यंत्रणा उपस्थित होती. खोत यांनी उपस्थितांना तुम्ही कृषी सहायकाला ओळखता का, असा थेट प्रश्न केला. त्यावर एकाने ‘हो’ असे उत्तर दिले. मात्र ते खोत यांना रूचलेही नाही अन् पचलेही नाही, हे त्यांच्या चेहºयावरून स्पष्टपणे जाणवत होते. त्याचवेळी त्यांनी तेथून गावातील रंजनाबाई भगत यांच्या घरी शौचालयाचे भूमिपूजन करण्यासाठी प्रस्थान केले. रस्त्याने जाताना-येताना त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावेळी मात्र त्यांना खरे उत्तर मिळाले. ग्रामस्थांनी त्यांना चक्क कृषी सहायकाला ओखळत नाही म्हणून सांगून टाकले. त्यांना कधी पाहिले नाही, त्यांचे नावही माहिती नाही, ते कधी येतही नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.कृषी सहायक गावात येतच नसल्याचे कळताच खोत यांनी तलाठ्याबाबत विचारपूस केली. त्यांच्याबद्दलही ग्रामस्थांनी तीच माहिती दिली. नंतर ग्रामसेवकाला याची रजिस्टरमध्ये नोंद घेता का, अशी विचारणा केली. ग्रामसेवकाने असे कोणतेच रजिस्टर नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे खोत यांचा पारा भडकला. त्यांनी अखेर तालुका कृषी अधिकाºयांना रोजनिशी दाखविण्याचे निर्देश दिले. मात्र कृषी अधिकाºयाजवळ रोजनिशीच नव्हती. ती घरी विसरल्याचे त्यांनी ठोकून दिले. यावरून सर्व प्रकार खोत यांच्या लक्षात आला. त्यांनी तहसीलदारांना या सर्व प्रकाराबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल ग्रामविकास विभागाला पाठविला जाणार असून कृषी विभागाशी संबंधित कर्मचाºयांवर थेट कृषी राज्यमंत्री खोत कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवायापुढे ग्रामपंचायतीत रजिस्टर ठेवून त्यात गावात येणाºया कर्मचाºयांच्या नोंदी ठेवा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री खोत यांनी दिले. कृषी सहायक, तलाठी यांच्या भेटीचे दिवस निश्चित करा. ते त्यानुसार येतात का, याची नोंद ठेवा, असेही त्यांनी बजावले. खोत यांच्या आगळ्यावेगळ्या दौºयाने कर्मचाºयांमध्ये धडकी भरली आहे. त्यापैकी कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते, याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.