शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

विद्युत ब्रेकडाऊनने ग्रामीण जनता वैतागली

By admin | Updated: May 3, 2015 23:56 IST

तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक ....

इन्सूलेटर होत आहे निकामी : गावठाण फिडरवर दररोज ‘फॉल्ट’दारव्हा : तालुक्यातील जवळपास सर्वच गावठाण फिडरवर दोन महिन्यांपासून सतत बिघाड होत असून वितरण कंपनी ब्रेक डाऊनच्या नावाखाली १२-१२ तास तर कधी दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित करीत असल्याने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यात स्वतंत्र गावठाण फिडर योजनेतून कृषीपंप व गावठाणासाठी वेगवेगळी लाईन टाकण्यात आली. गावठाणसाठी नवीन विद्युत खांब व तारांचे काम करण्यात आले. मात्र गाझियाबाद येथील कंपनीने तालुक्यात गावठाणचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षभरापासून अनेकदा या लाईनमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याने तर कधी साध्या हवेच्या झुळुकीनेही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. गावठाण फिडर योजनेच्या कामात वापरण्यात आलेले इन्सूलेटर हे निकृष्ट दर्जाचे असल्याने वारंवार ते फुटून किंवा लिकेजेसमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.या संदर्भात काही जागरूक नागरिकांनी ऊर्जा मंत्र्यांकडे अनेक लेखी तक्रारीही दाखल केल्या. त्यावर सदर कंपनीच्या कामासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली हा विषय गुलदस्त्यातच आहे. तालुक्यात दररोज कुठे ना कुठे बिघाड निर्माण होत असून दारव्हा विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व लाईनमन बिघाड दुरुस्तीचे काम दररोज करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दारव्हा तालुक्याचा भार पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच पडत आहे. एका ठिकाणचा बिघाड दुरुस्त होत नाही तोच दुसऱ्या गावात बिघाड निर्माण झाल्याने दारव्हा पॉवर हाऊसवरून पुरवठा खंडित करण्यात येतो. तो बिघाड दुरुस्त होईपर्यंत इतर गावांमध्ये विद्युत पुरवठाही बंद ठेवावा लागतो. त्यामुळे एकाचवेळी अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठ्याचा पत्ताच नसतो. तालुक्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज वितरणमधील बिघाडासंदर्भात अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने आवश्यक ते लक्ष न घातल्याने ग्रामीण जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यास मंजूर उपकेंद्राचे काम लवकर सुरू होण्यास मदत होईल. ग्रामस्थांना निश्चित अशा प्रकारांपासून दिलासा केव्हा मिळू शकेल हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. (प्रतिनिधी)उकाडा होतोय असह्य, अनेक गावात पाणीटंचाईवीज वितरणची यत्रंणा उदासीनतालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास असताना वीज कंपनीच्या यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.अनेक गावात नेमकी भर दुपारीच वीज गुल होत असल्याने उकाडा असह्य होत आहे. शेतात राबून घरी आलेल्या कष्टकऱ्यांना गार वारा मिळण्याची व्यवस्थाच गावातून हद्दपार झाली आहे. लाईन नसल्याने घरगुती फॅन व कुलरचाही वापर करता येत नाही. काही ठिकाणी तर भारनियमनामुळे नळयोजना कुचकामी ठरल्या असून, पाणीटंचाईही जाणवत आहे.