शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाची कामे ठप्प

By admin | Updated: November 24, 2014 23:07 IST

यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने

राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने अद्यापही हे आंदोलन संपलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बहिष्कार टाकून ग्रामसेवकांनी हे असहकार आंदोलन पुढे रेटत नेले आहे. या आंदोलनामुळे ग्रामविकासाची कामे मात्र ठप्प झाली आहे.ग्रामसेवकांची त्यांच्या ग्रामपंचायतस्तरावरील दैनंदिन कामे सुरू आहेत. पण जिल्हा परिषदस्तरावर, पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या बैठकांत, शासन व जनप्रतिनिधींच्या विविध योजना, कार्यक्रम राबविणे, सूचना देणे, सुरू असलेल्या तथा पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेणे आदी बाबी थांबल्या आहेत. सप्टेंबर, आॅक्टोबर महिना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. त्यानंतर दिवाळी झाली. दिवाळीनंतरच्या दोन आठवड्यात अनेक शासकीय सुट्या आल्या. त्यानंतर ग्राम विकासासंदर्भातील विविध कामांचा वेग वाढेल, अशी अपेक्षा असताना ग्रामसेवकांचे बहिष्कार व असहकार आंदोलन सुरू झाले. ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. चर्चेत काही मागण्या मान्य करण्यात आल्या. पण इतर मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही.ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर सेवा काळात कोणताही कसूर, चूक, तक्रारीवर लगेच निलंबनासारखी कडक कारवाई केली जाते. पण त्यांच्या हिताच्या मागण्या पाच-पाच वर्षे सोडविल्या जात नाही. संबंधितांकडून वारंवार टोलवाटोलवी केली जाते, असा आरोप संघटनेकडून होत आहे. आताही ग्रामसेवकांनी प्रथम आंदोलन मागे घ्यावे, त्यानंतर इतर मागण्यांवर विचार करू, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यात तडजोड झाली नसल्याने हे असहकार आंदोलन पुढे चिघळू नये, यासाठी दोनही बाजूंनी दोन पावले समोर जाण्याची गरज आहे.नागरिकांच्या वैयक्तिक विकासाच्या, हिताच्या योजना, ग्रामपंचायतीच्या भौतिक, सार्वजनिक विकासाच्या योजना राबविण्याच्या आणि त्या पूर्ण करण्याचा हाच अत्यंत महत्त्वपूर्ण कालावधी आहे. मात्र यासाठी दोनही बाजूंनी लवचिकता दाखवून आंदोलन आटोपते घेण्याच्यादृष्टीने प्रयत्नांची गरज आहे. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.डी. मस्के यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)