शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जलमनी योजना ठरली कुचकामी

By admin | Updated: November 19, 2016 01:27 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाने महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली होती.

लाखो रुपये पाण्यात : विद्यार्थ्यांचे आरोग्यही आले धोक्यातपांडुरंग भोयर  सोनखासग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाने महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली होती. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु सध्या या योजनेचा बोजवारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. नेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा असून, यामध्ये उच्च प्राथमिक मराठी शाळांची संख्या ३२ आहे तर एक ते चार वर्ग असलेल्या शाळांची संख्या ५९ आहे. यामध्ये दोन उर्दु तर सात शाळा नगरपरिषदेच्या कक्षात येणाऱ्या आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जनमनी शुद्धीकरण योजना तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच वर्षांपूर्वीच पाणी शुद्धीकरण मशिन सर्व शाळांना वितरित करण्यात आल्या आहेत. परंतु सध्या स्थितीत बहुतांश शाळांमधील पाणी शुद्धीकरण मशिन बंद पडून धुळखात असलेल्या स्थितीत दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी वॉटरबॅगमधून आपल्या घरुनच आणावे लागत आहे. शासनाकडू विद्यार्थ्यांना निर्जुंतुक तसेच क्षार विरहित पाणी मिळावे यासाठी ही योजना राबविली जात होती. या योजने अंतर्गत शाळांना पाणी शुद्धिकरण यंत्रांचे देखील वाटप करण्यात आले. परंतु आता हे यंत्र धूळखात पडून असल्याचे चित्र तालुक्यातील ठिकठिकाणच्या शाळांमधुन सर्रास दिसून येते. यामध्ये शासनाने खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जलमनी योजना सुरू करण्यात आली. यामध्ये निर्जुंतुक तसेच क्षार विरहित पाणी विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या सूचना आहे. त्याकरिता खास जलशुद्धिकरण मशीन प्रत्येक शाळांना देण्यात आल्या आहेत. परंतु हे मशिन सध्या धुळखात असल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, शासनाच्या मुळ हेतुलाच हरताळ फासल्या जात आहे. याबाबीची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच जलमनी शुद्धिकरण मशिनची दुरूस्ती करण्या येऊन त्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नियमित व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी व पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)