शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

जिल्हा कृषी विभागाला ग्रामीण परिसराची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: August 31, 2015 02:16 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात खरिपाच्या लागवडीनंतर कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन पाहिले नाही.

हिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात खरिपाच्या लागवडीनंतर कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शनच मिळत नाही. केवळ संबंधित कृषी सहाय्यक गावात येतो व योजनेसंदर्भात माहिती सांगून जातो. शेतकऱ्यांना सध्या खरी गरज आहे ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची. परंतु कृषी विभागातील अधिकारी वर्गाला हिवरी परिसराची अ‍ॅलर्जी असल्याचे दिसून येते. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी काळजीेत होते. त्यातून कसेबसे वाचले असताना आता पीक दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पिके डोलू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीही आनंदात होते. परंतु अशातच सोयाबीन व कपाशीवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशावेळी वेळीच बंदोबस्त केल्यास पिकांची सरासरी घटणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती पीक पाहणी करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन कुठल्या रोगावर कोणते औषध फवारावे तसेच कोणत्या पिकांना कोणते खत द्यावे आदी माहितीची नितांत गरज आहे. परंतु कृषी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कृषी केंद्र चालकाच्या मर्जीप्रमाणे महागडी औषधे घेऊन शेतकरी फवारणी करीत आहेत व पिकांना खत देत आहेत.फवारणी केल्यानंतर किंवा खत दिल्यानंतर त्याचा कोणताही फायदा या पिकांना झालेला नाही, असा हिवरी परिसरातील व इतर गावातीलही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येते. याबाबत संबंधित कृषी केंद्रात जाऊन विचारणा केल्यास वातावरणातील बदल किंवा फवारणीचे पाणी अस्वच्छ असणे, जास्त पाणी टाकणे, कमी औषध टाकल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगितल्या जाते. यातील खरे कारण म्हणजे ज्या घटकांची ज्यावेळी, ज्या पिकांना गरज असते ते घटक माहिती अभावी शेतकरी पिकांना देऊ शकत नाही. त्यानंतर कोणतेही औषध फवारून किंवा खते देऊन त्याचा पिकांना आवश्यक तो फायदा होत नाही. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांची खरी गरज असते. याकडे जिल्हा कृषी अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये होत आहे. (वार्ताहर)