शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

नियम तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कासरा आवरला

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे फेरबदल केले आहे.

यवतमाळ : प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे फेरबदल केले आहे. नियम तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कासरे आवरले जाणार असून कारभार सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी धडक निर्णय घेणे सुरू केले आहे. कार्यालयीन कामात शिस्त आणण्यासाठी एका बैठकीत कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी एकमताने ड्रेस कोडवर सहमती दर्शविली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सक्तीचा झाला आहे. पुरुषांसाठी पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट आणि महिलांसाठी पांढरी साडी ड्रेस कोड राहणार आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी का होईना शासकीय कर्मचारी एका ड्रेस कोडमध्ये दिसणार आहे. प्रारंभी या ड्रेस कोडची सक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीच राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली. (शहर वार्ताहर) ३० हजार कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यावर टाच जिल्ह्यात सुमारे ३० हजार कर्मचारी असून ते नियमितपणे घरभाडे भत्ता घेतात. मात्र यातील बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहतच नाही. मूळ पगाराच्या दहा टक्के घरभाडे भत्ता दिला जातो. यामुळे शासनाच्या तिजोरीला दरमहा लाखोंचा चुना लागतो. आता या प्रकाराला चाप बसविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सबळ पुरावे देण्याचे आदेश दिले आहे.