शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

‘डीपीसी’त ३९९ कोटींच्या प्रारूप आरखड्यास मंजुरी

By admin | Updated: January 23, 2015 00:08 IST

जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारच्या बैठकीत ३९९ कोटी ८५ लाख ९१ हजारांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला.

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारच्या बैठकीत ३९९ कोटी ८५ लाख ९१ हजारांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. खासदार राजीव सातव यांनी बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत कामांना तांत्रिक मंजुरी देण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी का लागतो अशी विचारणा केली. गारपीटग्रस्तांच्या १९० कोटी पैकी १२ कोटी रुपये शिल्लक असून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. राजू तोडसाम यांनी पांढरकवडा शहरातील वादळाच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या वाटपात अपहार होत असल्याचे सांगितले. एकाच शेतकऱ्याला वेगवेगळ््या बँकेत असलेल्या खात्यामध्ये मदत दिली जात आहे. या प्रकरणात संबंधित तहसीलदार, तलाठी आणि लिपिकाला निलंबित करण्याची मागणी रेड्डी यांनी केली. याबाबत पालकमंत्र्यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. यावर भावना गवळी यांनी तत्काळ ठराव मंजूर करण्याची मागणी केली. पाणीपुरवठा आणि वीज वितरणच्या उपकेंद्राची प्रस्तावित कामे यावर सदस्यांनी दोन्ही विभागातील यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यात १६ वीज उपकेंद्र मंजूर झाले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी दिली. वीज उपकेंद्र आणि रोहित्र संदर्भात सदस्य आक्रमक होताच स्वत: पालकमंत्र्यांनीसुद्धा याच मुद्द्यांवर आतापर्यंत भांडत आलोय अशी कबुली दिली. तालुका क्रीडा संकुलाचे १० तालुक्यात काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित ठिकाणी जागाच उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या माहितीत तफावत असल्याचे आमदार मनोहरराव नाईक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी निदर्शनात आणून दिले. महागावच्या क्रीडा संकुलाचे काम अर्धवट का आहे अशी विचारणा केली असता तेथे तालुका क्रीडा अधिकारी नसल्याची सबब पुढे करण्यात आली. निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात खरेदी-विक्री व्यवहार बंद आहे, ही बंदी उठविण्यात यावी तसेच धरण विरोधी समितीवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी केली. याबाबत योग्य कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. भावना गवळी यांनी अर्धवट राहिलेल्या नळ योजनांचे बळजबरीने हस्तांतरण होत असल्याकडे लक्ष वेधले. पुसद तालुक्यातील हर्षी, मारवाडी, नेर तालुक्यातील करजगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करून योजना चालू केल्यानंतर हस्तांतरीत करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरण अभियंत्यांना देण्यात आले. गावपातळीवर असलेल्या स्वच्छता व पाणीपुरवठा समितीने राष्ट्रीय पेयजलच्या योजनेत अपहार केला, त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. याबाबतची कारवाई तातडीने होत नसल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली. फ्लोराईडयुक्त पाणी असलेल्या गावांमध्ये आरओ प्लांट सुरू करण्यात यावे, यासाठी प्रसंगी आमदार निधीतून आर्थिक तरतूद करण्याची तयारी दाखवावी असे आवाहन मनोहरराव नाईक यांनी बैठकीत केले. रस्त्यापेक्षा पिण्याच्या शुद्ध पाण्याला प्राधान्य देण्यात यावे असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. खनीज विकास निधीचा उपयोग शुद्ध पाण्यासाठी करता येणे शक्य असल्याचे नाईक यांनी सूचविले. याचवेळी खुद्द पालकमंत्र्यांनी शाळेतील जलमनी प्लांटचे काय झाले अशी विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर मिळाले नाही. अडचणीत सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीला जिल्हा परिषद सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी धावून गेले. मात्र त्यांचा हा सततचा प्रयत्न मनोहरराव नाईक यांनी हाणून पाडला. योग्य आणि समर्पक माहिती द्या अशी सूचना नाईक यांनी केली. यानंतर सीईओ यांनी आरओ प्लांट संदर्भात एक महिन्यांचा वेळ समितीकडे मागितला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, खासदार राजीव सातव, आमदार मनोहरराव नाईक, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू नजरधने, आमदार राजू तोडसाम, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)