शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

सायबरच्या दहा गुन्ह्यांतील ११ लाख रुपये झाले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते.

ठळक मुद्दे२६ तक्रार अर्जही निकाली : बँकेशी निगडीत गुन्हे थांबले, सोशल मीडियाद्वारे झाली होती अनेक नागरिकांची फसगत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. जुलै अखेरपर्यंत १० गुन्हे दाखल झाले, तर २६ तक्रार अर्ज वेळेत आल्याने होणारे नुकसान टाळता आले. सायबर सेलने दहा गुन्ह्यातील फसवणुकीच्या १५ लाख रकमेपैकी ११ लाख वसूल करण्यात यश मिळविले आहे. सध्या बँकेशी निगडीत फ्रॉड कमी झाले असून सोशल मीडियावरची फसगत वाढली आहे.ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज तातडीने आल्याने एक लाख २० हजार रुपयांची रक्कम सायबर सेलला रिकव्हर करता आली. यातून ग्राहकांचे नुकसान टळले, तर आयटी अ‍ॅक्टच्या दहा गुन्ह्यात १५ लाखांची फसवणूक झाली होती. त्यातील ११ लाख रुपये सायबर टीमने वसूल केले आहे. गेल्या काही दिवसात बँक फ्रॉडचे प्रमाण कमी होत आहे. नागरिक सतर्क झाल्याने ओटीपी, पीन नंबर व इतर माहिती ते फोनवर शेअर करत नाही. त्यामुळेच आता फ्रॉड करणाऱ्यांनीही आपला मोर्चा बदलविला असून ते चांगल्या वाहनांची कमी किमतीत विक्री, उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून सोशल मीडियातून फ्रेण्डशीप व नंतर फसवणूक करत असल्याची प्रकरणे घडत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियाचे अ‍ॅप वापरताना टू स्टेप व्हेरिफिकेशन सिस्टीम अपग्रेड करणे गरजेचे आहे.ई-वॉलेटमधील अ‍ॅपच वापरा - एपीआय अमोल पुरीआरबीआयने ऑनलाईन व्यवहारासाठी असलेल्या काही अ‍ॅपला ई-वॉलेट कॉमर्समधून वगळले आहे. त्यामुळे हे अ‍ॅप वापरताना काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळणार नाही. यात फोन पे व गुगल पे हे दोनही अ‍ॅप वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय असलेल्याच अ‍ॅपचा वापर करावा. ज्यांचा समावेश ई-वॉलेटमध्ये आहे. जेणेकरून काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता राहते, अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक अमोल पुरी यांनी दिली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम