शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नियोजित ठिकाणाऐवजी भलतीकडेच बनवला रस्ता

By admin | Updated: January 6, 2016 03:21 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची विविध कामे वादग्रस्त ठरत आहे. या संदर्भात वेळोवेळी ओरड होवूनही

आर्णी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची विविध कामे वादग्रस्त ठरत आहे. या संदर्भात वेळोवेळी ओरड होवूनही कामकाजाच्या पद्धतीत मात्र बांधकाम विभागाने सुधारणा केलेली नाही. आर्णी तालुक्यात तर पूर्वनियोजित ठिकाण सोडून भलतीकडेच रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. रुद्रापूर ते चिकणी हा पांदण रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केला आहे. परंतु हा रस्ता नियोजित नकाशानुसार झालेला नाही. यात चिकणी शिवारात शेत असलेले अल्पभूधारक आदिवासी शेतकरी बळीराम जयराम सोयाम (६५) यांच्या शेताच्या मधातून हा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत शेतकऱ्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि आर्णीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे.या कामावरील संबंधित अभियंत्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. पाहिजे तेथे पाणी जाण्यासाठी सिमेंटचे पाईपही टाकलेले नाही. याची वरिष्ठांनी लगेच दखल घेवून संबंधित अभियंत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियोजित ठिकाणावरून हा रस्ता करावा व शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणीही तक्रारीत शेतकऱ्याने केली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या बांधकामासाठी आधीच ठरविलेल्या जागेवर रस्ता होईल, अशी परिसरवासीयांना मोठी आस होती. बांधकाम विभागाने तत्परता दाखवून रस्ता बांधलादेखील. पण हा रस्ता पूर्वनियोजित जागेवर बांधण्याऐवजी एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उभ्या पिकात घुसवण्यात आला. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेच, परंतु जेथे रस्त्याची खरी गरज होती त्या परिसरातील नागरिकही रस्त्यापासून वंचित राहिले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या उफराट्या कारभाराबद्दल परिसरात चांगलाच संताप निर्माण झाला आहे. कुणाची सरबराई करण्यासाठी किंवा कुणाचे उखळ पांढरे करण्यासाठी रस्त्याच्या नियोजित ठिकाणामध्ये बदल करण्यात आला, असा प्रश्न सर्वसामान्य गावकऱ्यांना पडलेला आहे. आता या संदर्भात वरिष्ठ अधिकारी कोणती पावले उचलतात, याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे शेतकरी वाचवण्यासाठी शासनाचे अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे काही अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. (शहर प्रतिनिधी)