शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

बारदाना आला, पण जागाच नाही

By admin | Updated: March 17, 2017 02:44 IST

बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर

सरकारी भूमिका शंकास्पद : यवतमाळ, बाभूळगावला गोदामच नाही यवतमाळ : बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याच्या मंजुरीनंतरच तूर खरेदीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे खरेच सरकार तूर खरेदी करणार का, असा प्रश्न तूर उत्पादकांना सतावत आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून तूर खरेदीने उग्ररूप धारण केले आहे. बाजार समितीच्या सभापतींनी प्रथम बारदाना आंदोलन केले. खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यानंतरही शासकीय यंत्रणा ही समस्या गांभीर्याने सोडविण्यास तयार नाही. बारदाना घेऊन निघालेला एक ट्रक जिल्ह्यात दाखल झाला अन् पुन्हा नव्या संकटाला सुरूवात झाली. बारदाना येताच सीडब्लूसीने जागा नसल्याचे कारण सांगत तूर ठेवण्यास नकार दिला. परिणामी बारदाना मिळूनही तूर खरेदी थांबली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात तूर साठवली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला आणखी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शासकीय खरेदीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता धीर सोडला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने तुरीचे नुकसान होत आहे. (शहर वार्ताहर) राळेगाव केंद्र बंद, आर्णीत बारदानाही नाही यवतमाळ व बाभूळगाव केंद्रावर तूर खरेदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या दोन्ही ठिकाणी बारदाना उपलब्ध आहे. मात्र आता जागा नाही. आर्णी केंद्रावर जागा आहे, मात्र बारदाना नाही. राळेगावचे केंद्र एफसीआयने बंद केले आहे. व्हीसीएमएसची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव तथापि खरेदी झालेली तूर ठेवण्यासाठी यवतमाळ केंद्राकडे जागाच नाही. यामुळे यवतमाळचे व्हीसीएमएसचे केंद्र अडचणीत सापडले आहे. या ठिकाणी बारदाना असला तरी जागाच नसल्याने तूर ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी अडचणीत सापडले आहे. त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.