शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच एकरातील उभ्या संत्रावर फिरविली आरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

हरिओम बघेललोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : अस्मानी व सुलतानी संकटामुळे सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे. शासकीय धोरणामुळे अनेक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याच संतापातून तालुक्यातील उमरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तब्बल पाच एकरावर उभ्या असलेल्या संत्रा झाडांवर आरी चालविली. शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने हताशपणे त्यांनी आता फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरा चालविला. पावसामुळे नुकसान होऊनही शासकीय कर्मचारी संवेदनशीलपणे वागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनदरबारी कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मेश्राम यांनी सांगितले. 

आरा चालविताना डोळ्यांत अश्रू मुलाप्रमाणे जपलेली संत्राबाग स्वत:च काढून टाकताना रघुनाथ मेश्राम यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. शासन आणि कृषी विभागाने कोणतीही मदत न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या झाडांचे आता संरक्षण करू शकत नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या संत्राबागेवर आरा चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले.