शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

रोटरीच्या ‘एज्युफेस्ट’ने दिली शिक्षणाची नवी दिशा

By admin | Updated: January 24, 2015 23:02 IST

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो.

यवतमाळ : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. यावेळी जर का दिशा चुकली तर, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. यावर मात करण्यासाठी रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनतर्फे ‘रोटरी एज्यूफेस्ट’चे (शिक्षण महोत्सव) आयोजन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे जत्थे यवतमाळात दाखल होत आहेत.येथील स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत हा शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील विविध नामांकित शाळा-महाविद्यालयांनी माहिती सांगण्यासाठी विविध स्टॉल्स लावले आहेत. या स्टॉल्सवर केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचेचे नव्हे तर, शिक्षण क्षेत्रातील विविध दालने खुली करण्यात आली आहेत. ३९ स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले आहे. चार हजार विद्यार्थ्यांनी दोन दिवसात या स्टॉल्सला भेटी दिल्या. यासोबतच विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात आले आहे. दहावीनंतरचे करिअर गायडन्स, बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, सैनिक प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा आणि पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन विविध तज्ज्ञांनी केले. या मार्गदर्शनाला तीन हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. थेट ग्रामीण भागातील विद्यार्थी माहिती जाणून घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले होते. (शहर वार्ताहर)