शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

रोटरीच्या ‘एज्युफेस्ट’ने दिली शिक्षणाची नवी दिशा

By admin | Updated: January 24, 2015 23:02 IST

दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो.

यवतमाळ : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते. या शिक्षणानंतर पुढे कुठल्या क्षेत्राची निवड करायची, हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना पडतो. यावेळी जर का दिशा चुकली तर, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. यावर मात करण्यासाठी रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनतर्फे ‘रोटरी एज्यूफेस्ट’चे (शिक्षण महोत्सव) आयोजन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचे जत्थे यवतमाळात दाखल होत आहेत.येथील स्टेट बँक चौकातील खुल्या जागेत हा शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील विविध नामांकित शाळा-महाविद्यालयांनी माहिती सांगण्यासाठी विविध स्टॉल्स लावले आहेत. या स्टॉल्सवर केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचेचे नव्हे तर, शिक्षण क्षेत्रातील विविध दालने खुली करण्यात आली आहेत. ३९ स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले आहे. चार हजार विद्यार्थ्यांनी दोन दिवसात या स्टॉल्सला भेटी दिल्या. यासोबतच विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात आले आहे. दहावीनंतरचे करिअर गायडन्स, बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, सैनिक प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा आणि पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन विविध तज्ज्ञांनी केले. या मार्गदर्शनाला तीन हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. थेट ग्रामीण भागातील विद्यार्थी माहिती जाणून घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले होते. (शहर वार्ताहर)