शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

आमदार रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 18:15 IST

केंद्राकडून ईडी, आयटी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो. हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, असे मत आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुसदला दिली धावती भेट

यवतमाळ : सध्या राज्यात ईडी, आयटी, एनसीबी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्धही हा प्रयोग करण्यात आला, असा आरोप आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी केला.

आमदार रोहित पवार यांच्या पुसद भेटीत नाईक बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी व लोकांच्या मनावर खोट्या गोष्टी बिंबविण्यासाठी हा प्रयोग होत असेल, तर उद्या या स्वायत्त संस्थांवर कोण विश्वास ठेवणार ? हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांनी स्वायत्त संस्थांची पहिली माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांना कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला. या संस्था धाडी टाकतात. नंतर त्यात काहीही सापडत नाही; परंतु भाजप अशा रीतीने प्रपोगंडा करते की, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. बिहार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेता सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी असाच संभ्रम निर्माण करण्यात आला. चित्रपट अभिनेता शाहरुख खानच्या मुलावरील एनसीबी धाड प्रकरणातही लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हीच नीती वापरण्यात आल्याची चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर भाजपला बोलण्याचा हक्क नाही. हा संपूर्ण विषय केंद्राचा आहे. संसदेच्या अधिवेशनात एकाही भाजप खासदाराने हा प्रश्न मांडला नाही. संभाजीराजे यांनाही खासदार संजय राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर बोलण्याची संधी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. भाजपवर हल्ला चढवताना ते म्हणाले, राज्याचे हक्क केंद्राने काढून घेतले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या ‘फेडरलायझेशन अमेंडमेंट’ने हा हक्क काढण्याचा निर्णय घाईत पारित केल्यानंतर भाजप गप्प बसले. नंतर आरक्षणाची टिमकी वाजविण्यासाठी पुढे आले. भाजपाची ही बेरकी चाल आहे, अशी टीका त्यांनी केली.

ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजप वेगवेगळ्या सभा घेत आहे. हा नुसता आपुलकीच्या देखाव्याचा फुगा आहे. केंद्राने ओबीसींचा २०१४ ला संग्रहित झालेला एम्पिरिकल डाटा राज्याला का दिला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ओबीसींचा स्ट्राँग होल्ड आहे. ओबीसींची टक्केवारी वाढू शकते व त्याद्वारे भाजपला धक्का बसू शकतो, अशी भीती असल्यानेच भाजपची तयारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या तोडफोडीचे राजकारण वाढले असून या राजकीय गोंधळात विकासाचे प्रश्न मागे पडले आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहरराव नाईक, आमदार इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक, ययाती नाईक, आदी उपस्थित होते.

अतिवृष्टीने ४२ लाख हेक्टरचे नुकसान

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी केलेली मदत तुटपुंजी आहे का?, यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी, केंद्राच्या दुजाभावाची चिरफाड केली. नैसर्गिक संकटात केंद्राच्या एनडीआरएफचा मदतीचा वाटा मोठा असतो. गेल्यावेळी गुजरातमध्ये वादळ होताच पंतप्रधानांनी दुसऱ्याच दिवशी दौरा करून एक हजार कोटींची मदत केली. मात्र, महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीला दोन महिने लागले.

राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले. केंद्राची मदत आली नाही. ही बाब पंतप्रधानांना ठाऊक नसेल, तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे का मांडली नाही, असा सवाल त्यांनी केला. राज्याला जीएसटीचे ३५ हजार कोटी मिळाले नाहीत, पंधराव्या वित्त आयोगाचे केंद्राने पैसे दिले नाहीत, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRohit Pawarरोहित पवार